‘हतनूर’चे ३६ गेट उघडले

Hatnur-Dam
Hatnur-Dam

जळगाव - गेल्या तीन दिवसांपासून मॉन्सून जिल्ह्यात रुळला आहे. यामुळे आतापर्यंत एकूण पावसाच्या सरासरीच्या ३५ टक्के पाऊस झाला आहे. आज सायंकाळी सातला व रात्री दहाला हतनूर धरणाचे ३६ दरवाजे उघडण्यात आल्याने जलविसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे तापी नदीला पूर आला आहे. धरणातून ९३६ क्‍यूमेक्‍स एवढे पाणी सोडले जात आहे.

जिल्ह्यात तीन दिवसांपासून सूर्यदर्शन नाही. समाधानकारक पावसामुळे पिकांची वाढ जोमात होत आहे. आता अनेक ठिकाणी पावसाची उसंत मिळताच पिकांना खते देतानाचे चित्र दिसू लागले आहे. गेल्या गुरुवारपर्यंत पाऊसच नव्हता. मात्र, गुरुवारी रात्रीपासून जिल्ह्यात पाऊस सुुरू झाला. कोठे कमी, तर कोठे अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. यामुळे अनेक ठिकाणचे नद्या- नाले वाहू लागले आहेत. धरणांतील साठ्यातही वाढ होत आहे. यामुळे पावसाबाबत समाधानाचे वातावरण आहे. मात्र, एकूण सरासरीच्या केवळ ३५ टक्‍केच पाऊस झाल्याने अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. त्याशिवाय कोरडे असलेले प्रकल्प व अनेक प्रकल्पांत अद्याप पाणीसाठा झालेला नाही. 

दरम्यान, झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. आता शिल्लक असलेल्या वीस टक्के पेरण्याही पूर्ण होतील. हा पाऊस पिकांच्या वाढीस योग्य असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com