वाचाळ विरांवर लगाम ठेवण्यासाठी आता कायदा हवा : गिरीश महाजन

girish-mahajan
girish-mahajan

जळगाव: राजकीय स्वार्थासाठी कोणी ही महापुरूषाविरूध्द अपशब्द बोलत आहेत. या प्रकराला आता कुठेतरी लगाम बसला पाहिजे. अशा वाचाळ विरांवर आळा बसण्यासाठी केंद्र सरकारने अत्यंत गांभीर्यांने लक्ष देवून त्याबाबत स्वतंत्र कायदा करावा असे मत भाजपा नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. 

जळगाव येथे पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले, सद्यस्थितीत श्री साईबाबा, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी कुणी काहीही बोलत आहे. भारतात असलेल्या लोकशाहीचा गैरफायदा घेतला जात आहे. अगदी राजकीय स्वार्थासाठी महापुरूषांविरूध्द बोलले जात आहे. परंतु ही अत्यंत गंभीर 
बाब आहे, हे कुठेतरी थांबले पाहिजे. केंद्र सरकारने याकडे आता गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. महापुरूषाविरूध्द बोलणाऱ्यावर आता कडक कारवाई झाली पाहिजे.यासाठी केंद्र शासनाने स्वतंत्रपणे कायदा करण्याची गरज आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com