जळगाव : "छू...मंतर करीत जनतेचे प्रश्न सोडविण्याची सरकारकडे जादूची कांडी नाही, आमचे सरकार वेगाने काम करीत आहे. निदान सहा महिने तरी आम्हाला वेळ द्या, त्यानंतर तुम्ही आंदोलन करा', असे मत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.
राज्य सरकारविरोधात भाजपच्या नेत्यांनी आता आंदोलन सुरू केले आहे. पंकजा मुंडे आज औरंगाबाद येथे उपोषणास बसल्या होत्या. त्या ठिकाणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सहभाग घेतला. याबाबत बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, आमच्या सरकारला अद्याप महिना पूर्ण होत आहे. त्या दृृष्टीने आम्ही वेगाने कार्य करीत आहोत. मात्र, आमच्याकडे छू..मंतर करीत लगेच प्रश्न सोडविण्याची जादूची कांडी नाही. पंकजाताई माजी मंत्री होत्या. त्यांना प्रशासनातील जाण आहे. त्यामुळे त्यांनी आंदोलनाची घाई करायला नको होती. मराठवाड्याच्या पाणीप्रश्न सोडविण्यासाठी "मराठवाडा ग्रीड' ही 24 हजार कोटीची योजना आहे. त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत त्याबाबत बैठकही झाली आहे. आपण स्वत:त्या बैठकीस होतो. त्यामुळे त्यांनी किमान सहा महिने तरी वाट पाहायला हवी, त्यानंतर जर आम्ही प्रश्न सोडविण्यास कमी पडलो तर त्यांनी आमच्याविरुद्ध जरूर आंदोलन करावे. परंतु त्यांनी आता आम्हास वेळ देऊन थांबायला हवे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.