जळगाव:महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ आणि समर्पण संस्था संचलित पर्यावरण शाळा यांच्यातर्फे ३१ जानेवारीला शहरात होणाऱ्या पर्यावरण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पर्यावरण चळवळीतील ज्येष्ठ कार्यकारत आणि सातपुडा फाउंडेशनचे अध्यक्ष्य किशोर रिठे(अमरावती) यांची निवड करण्यात आली आहे.
श्री रिठे गेल्या तीस वर्षांपासून निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण चळवळीत सक्रिय आहेत .केंद्र राज्य शासनाच्या अनेक महत्वपूर्ण अश्या तीस समित्यांमध्ये त्यांनी तद्न्य सदस्य आणि मार्गदर्शक म्हणून महत्वपूर्ण कामगिरी केली आहे.शासनाकडे अभ्यासपूर्ण अहवाल सादर केले.
याशिवाय,ऑक्सफोर्ड विद्यापीठातून वन्यसंवर्धन या विषयात पद्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला असून,अभियांत्रिकी क्षेत्रातील उच्च पदवीही त्यांनी संपादन केली आहे,चळवळीमध्ये सक्रिय पाने कार्य करीत असतानाच निसर्गसंवर्धन क्षेत्रात त्यांनी विपुल लोखं केले आहे.अनेक वृत्तपत्रांमध्ये पाचशेपेक्षाही अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत.मेळघाट व्याघ्र प्रकल्प,ताडोबा व्याघ्र प्रकल्प,बोर व्याघ्र प्रकल्प आदींसाठी कोफी टेबले बुक साठी त्यांनी लोखं केले आहे.अनेक ईंग्रजी मासिके,नियतकालिकांमधून ते सातत्याने लिहितात .विशेषतः सेंचुरी आशिया मध्ये प्रसिद्ध झालेले लेख अतिशय गाजले आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.