लॉक डाऊन संपताच बाजारात उसळली गर्दी....चार दिवसानंतर रस्त्यांवर वर्दळ 

लॉक डाऊन संपताच बाजारात उसळली गर्दी....चार दिवसानंतर रस्त्यांवर वर्दळ 

भुसावळ: शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन चार दिवसांसाठी जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय घेतला होता. काल (ता. १७) कर्फ्युच्या शेवटच्या दिवसानंतर आज सकाळीच मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडल्याने रस्तांवर नागरिकांची अलोट गर्दी दिसून आली. मात्र, पोलिसांनी नागरिकांना अडवून माघारी पाठविण्याचा प्रयत्न केला. तरीही नागरिकांनी गल्लीबोळातून मार्ग काढून बेशिस्तपणाचे दर्शन घडवून दिले. 

शहरात कोरोनाच्या रुग्णामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. आतापर्यंत दहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन चार दिवस वैद्यकिय सेवा वगळता, किराणा, भाजीपाला दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे चार दिवस शहरात पुर्णत: शुकशुकाट जाणवत होता. मात्र आज पाचव्या दिवशी जनता कर्फ्यु संपताच जीवनाश्यक वस्तुंपुरतेच गरजा भागविणाऱ्या नागरिकांनी विविध वस्तुंची खरेदीसाठी बाजारात आल्याने झुंबळ उडाली होती. शहरातील सर्वच रस्त्यांवर वाहनांची वर्दळ दिसून आली. 

बहुतांश दुकाने बंदच 
प्रशासनातर्फे कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले परिसर सील करून संचारावर निर्बंध घातले. तसेच वेळापत्रक जारी करून जीवनाश्यक वस्तुंची दुकाने सुरू ठेवण्याची परवानी दिली. त्यामुळे सोमवारी शहरातील सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. खरेदीसाठी बाजारात झुंबड उडाल्याचे दिसून आले. मात्र, बहुतांश किराणा व्यावसायिकांनी आज आपली दुकाने बंदच ठेवली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com