जनता कर्फ्युनंतर नागरीक खरेदीसाठी रस्‍त्‍यावर 

market road
market road

चाळीसगाव : कोरोनावर प्रतिबंध लावण्‍यासाठी रविवारी, दि.२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या आवाहनानंतर सर्वत्र जनता कर्‍फ्‍यु पाळण्‍यात आला. परंतु सोमवारी, दि.२३ रोजी सकाळपासुनच नागरीकांनी जीवनावश्‍‍यक वस्‍तुंच्‍या खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती. परंतु दिवसभर मात्र शहरातील मुख्य रस्‍त्यांवर शुकशुकाट दिसुन आला. 


जगातल्‍या जवळजवळ सर्वच देशांमध्‍ये कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्‍यासाठी सर्वत्र खबरदारी घेण्‍यात येत असुन त्‍यादृष्‍टीने चाळीसगाव पालीकेच्‍यावतीने नुकतीच तहसिलदार अमोल मोरे, नगराध्‍यक्षा आशालता चव्‍हाण यांच्‍यासह सर्व सदस्‍यांची बैठक घेवुन शहरात जनजागृती करण्‍यात येवुन शहरात फवारणी करण्‍यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्‍या आवाहनानंतर रविवारी, दि.२२ रोजी चाळीसगाव शहरात सर्वऋ जनता कर्फ्यु पाळण्‍यात आला. त्‍यानुसार संपुर्ण शहरात लॉक डाउन पाळत सर्वांनी खबरदारी घेत घराबाहेर पडणे टाळले. परंतु सोमवारी, दि.२३ रोजी सकाळी भाजीपाला, दुध, किराणा, औषधी आदी जीवनावश्‍‍यक वस्‍तु घेण्‍यासाठी नागरीकांनी रस्‍त्‍यावर गर्दी केली. सेामवारी शहरात केवळ भाजीपाला, दुध, किराणा व औषधी यांचे दुकाने सुरू ठेवण्‍यात आली होती. इतर दुकाने उघडण्‍यासाठी दुकानदारांनी सकाळीच सुरूवात केली परंतु जमावबंदीचे आदेश सुरू असल्‍याने पोलीसांनी सकाळीच फेरी मारत दुकाने बंद ठेवण्‍याचे आदेश दिले. त्‍यानुसार चाळीसगाव शहरातील कापड दुकाने, हॉटेल, बाजार समिती, मोबाईल दुकाने यासह अन्‍य दुकाने दिवसभर बंद ठेवण्‍यात आले. 

भाजीपाल्‍याचे भाव कडाडले 
शनिवारी सायंकाळपासुन सर्वत्र बंद पाळण्‍यात आला. त्‍यानंतर रविवारी पुर्णताह बंद पाळण्‍यात आल्‍याने सोमवारी नागरीकांनी भाजीपाला व इतर वस्‍तु खरेदीसाठी गर्दी केली. परंतु ऐरवी वीस ते तीस रूपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री करण्‍यात येणारा भाजीपाला जवळपास ऐंशी ते शंभर रूपये प्रतिकिलो प्रमाणे विक्री करण्‍यात आला. दोन दिवस बंद असल्‍याने बाजारात भाजीपाल्‍याचीही आवक मोठया प्रमाणात घटल्‍याची माहिती भाजीपाल्‍याचे आडत व्‍यापारी आबा चौधरी यांनी दिली. 

बसच्‍या ६०० फेर्‍या रद 
जनता कर्‍फ्‍युमुळे रविवारी बससेवा पुर्णताह बंद होती. परंतु सोमवार दि.२३ ते ३१ मार्च पर्यंत बससेवा बंद ठेवण्‍याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. त्‍यानुसार चाळीसगाव आगारातील ६०० च्‍यावर बसफेऱ्या बंद करण्‍यात आल्‍या. यामुळे आगाराला मिळणारे तब्‍बल ७ लाख उत्‍पन्‍न बुडाले असुन २५ हजार किलोमीटरचा प्रवास थांबला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com