गोडसे विजयी झालेचं कसे?अपक्ष उमेदवार कोकाटेंना पडला प्रश्‍न 

residentional photo
residentional photo

नाशिक- नुकत्याचं पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल बाहेर पडल्यानंतर शिवसेनेचे हेमंत गोडसे त्यात विजयी झाले परंतू त्यांना हा विजय मिळालाचं कसा? असा सवाल अपक्ष उमेदवार व तिसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या ऍड. माणिकराव कोकाटे यांनी केला असून नाशिक लोकसभेचा निकाल संभ्रम निर्माण करणारा असल्याचे सांगताना मला ज्या समाजाने पाठींबा दिला त्या समाजाची मते गेली कुठे असा प्रश्‍न त्यांनी माध्यमांसमोर मांडला. 

गेल्या महिन्यात लोकसभा निवडणुकीचा निकाल बाहेर पडल्यानंतर प्रथमचं कोकाटे माध्यम प्रतिनिधींसमोर आले. ते म्हणाले, कार्यकर्त्यांचाचा आग्रह, आदीवासीं व मुस्लिमांचा पाठींबा मिळाल्याने विजयाची खात्री झाली व निवडणुक लढविली. कोठून किती मतदान पडेल याचा देखील अंदाज होता. मात्र निकालातून बाहेर पडलेली आकडेवारी अनाकलनीय आहे. ज्या मतांचा अंदाज बांधला होता. तेथे कमी-अधिक प्रमाण लक्षात घेतले तरी अपेक्षित मतदान पडले नाही. वकील वाडीतील प्रचारकांच्या कुटूंबातील शंभर टक्के मतदान अपेक्षित होते तेथे देखील क्षुल्लक मतदान झाले. लोकसभेचा निकाल माझ्यासाठी संभ्रम निर्माण करणारा आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com