haribhau jawale
haribhau jawale

राज्यात "महाविकास' नव्हे; "महाभकास' आघाडी 

जळगाव : राज्यातील "महाविकास' आघाडी सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या नावाखाली तोंडाला पाने पुसली आहेत. सातबारा अद्याप कोरा केलाच नाही. युती सरकारच्या काळातील विकासकामे बंद केली. राज्यातील हे सरकार "महाभकास' आघाडी सरकार आहे. त्यांच्याविरोधात मंगळवारी (25 फेब्रुवारी) जिल्हाभर आंदोलन केली जाईल, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांनी दिली. 

येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, डॉ. विजय धांडे, मनोज भांडारकर यावेळी उपस्थित होते. श्री. जावळे म्हणाले, की जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. या सरकारच्या राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. त्यामुळे महिला, तरुणींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या सरकारविरोधात जनतेत निराशा निर्माण झाली आहे. या सरकारचा निषेध करण्यासाठी भाजपतर्फे मंगळवार (25 फेब्रुवारी) जिल्हाभरातील तहसील कार्यालयासमोर सकाळी अकरा ते सायंकाळी पाचपर्यंत धरणे आंदोलन केले जाईल. यात जिल्ह्यातील आमदार, खासदार, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सहभागी होतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com