दुष्काळग्रस्त 151 तालुक्‍यांत दोन हजार कोटी वितरित : महसूलमंत्री पाटील

दुष्काळग्रस्त 151 तालुक्‍यांत दोन हजार कोटी वितरित : महसूलमंत्री पाटील

जळगाव ः राज्यातील खरीप हंगाम 2018 मध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या राज्यातील 151 तालुक्‍यांमधील पीक नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आकस्मिक निधीतून दोन हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. 
केंद्र शासनाच्या निकषानुसार दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या 151 तालुक्‍यांमधील शेतकऱ्यांना मदतीसाठी सुमारे 7 हजार 903.79 कोटी इतकी रक्कम लागणार होती. त्यापैकी यापूर्वी 2 हजार 909 कोटी 51 लाख 9 हजार इतका निधी यापूर्वीच विभागीय आयुक्तांकडे वितरित करण्यात आला आहे. त्या व्यतिरिक्त या तालुक्‍यातील बाधित शेतकऱ्यांना शेतीपिकाच्या नुकसानीपोटी तातडीने मदत वाटप करण्यासाठी 2 हजार कोटींचा आकस्मिकता निधी अग्रिमाद्वारे उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळाने 12 फेब्रुवारीच्या बैठकीत मान्यता दिली होती. त्यानुसार मदत व पुनर्वसन विभागाने दुष्काळी तालुक्‍यांमध्ये हा निधी वितरित करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर विभागीय आयुक्तांकडे वर्ग करण्यात आले आहेत. दोन हप्त्यात रक्कम 
शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे 33 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाल्याने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना देय असलेल्या मदतीची रक्कम दोन हप्त्यात प्रदान करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. प्रथम हप्ता म्हणून 6 हजार 800 रुपये प्रति हेक्‍टर या दराच्या 50 टक्के म्हणजेच 3 हजार 400 रुपये प्रति हेक्‍टर किंवा किमान 1 हजार रुपये यापैकी अधिक असेल ती रक्कम शेतीपिकांचे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 18 हजार प्रति हेक्‍टर या अनुज्ञेय दराच्या 50 टक्के म्हणजेच 9 हजार प्रति हेक्‍टर किंवा किमान दोन हजार यापैकी अधिक असेल ती रक्कम विहित अटींच्या अधीन राहून सर्व बाधित शेतकऱ्यांना देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 
पहिल्या हप्त्याची रक्कम वितरित झाल्यानंतर शिल्लक रकमेतून दुसऱ्या हप्त्याची रक्कम वितरित करण्याचे निर्देश प्रशासनास देण्यात आले असल्याचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांनी सांगितले. 
 

पाणीपुरवठा योजनांसाठी 173 कोटी 

ऑक्‍टोबर 2017 ते जून 2018 या कालावधीतील,2018-19 च्या टंचाई कालावधीत मार्च 2019 पर्यंत घेण्यात आलेल्या व येणाऱ्या उपाय योजनांवरील प्रलंबित देयके अदा करण्यासाठी तसेच ग्रामीण/ नागरी भागात पाणीटंचाई निवारण कार्यक्रमासाठी मदत व पुनर्वसन विभागाकडून 173 कोटी रुपयांचा निधी पाणीपुरवठा विभागास देण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

मदतनिधीची जिल्हानिहाय आकडेवारी 

जळगाव : 164 कोटी 82 लाख 
नाशिक : 117 कोटी 21 लाख 
धुळे : 80 कोटी 51 लाख 
नंदुरबार : 58 कोटी 58 लाख 
पालघर : 9 कोटी 71 लाख 
अहमदनगर : 192 कोटी 64 लाख 
पुणे : 73 कोटी 18 लाख 
सोलापूर : 134 कोटी 30 लाख 
सातारा : 29 कोटी 36 लाख 
सांगली : 47 कोटी 29 लाख 
औरंगाबाद : 153 कोटी 47 लाख 
जालना : 134 कोटी 58 लाख 
बीड : 174 कोटी 50 लाख 
लातूर : 4 कोटी 56 लाख 
उस्मानाबाद : 96 कोटी 20 लाख 
नांदेड : 35 कोटी 40 लाख 
परभणी : 73 कोटी 92 लाख 
हिंगोली : 49 कोटी 46 लाख 
बुलडाणा : 81 कोटी 33 लाख 
अकोला : 56 कोटी 5 लाख 
वाशीम : 17 कोटी 96 लाख 
अमरावती : 75 कोटी 91 लाख 
यवतमाळ : 94 कोटी 78 लाख 
वर्धा : 4 कोटी 11 लाख 
नागपूर : 23 कोटी 19 लाख 
चंद्रपूर : 16 कोटी 86 लाख 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com