दुष्काळी गावांतील 50 विद्यार्थ्यांना मोफत भोजन 

दुष्काळी गावांतील 50 विद्यार्थ्यांना मोफत भोजन 

जळगाव : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एमएचटी-सीईटी परीक्षा मेमध्ये होणार असून, नोबेल फाउंडेशनने त्यासाठी मार्गदर्शन वर्ग आयोजित केले आहेत. यंदा दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर दुष्काळी गावांतील 50 विद्यार्थ्यांची या प्रशिक्षण वर्गाच्या काळात मोफत भोजन व्यवस्था करत फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. 
अभियांत्रिकी, फार्मसी तसेच कृषी पदवीसाठी यावर्षी 2 ते 13 मे दरम्यान ऑनलाइन एमएचटी- सीईटी प्रवेश परीक्षा होत असून, त्यासाठी उन्हाळी मार्गदर्शन वर्ग 7 मार्च ते 30 एप्रिलदरम्यान होत आहे. यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने फाउंडेशनतर्फे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षणकाळात विनामूल्य भोजन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या योजनेसाठी दात्यांनी किमान एक मुलगा दीड महिन्यासाठी दत्तक घ्यावा, असे आवाहन फाउंडेशनने केले आहे. योजनेच्या लाभासाठी 5 ते 9 मार्चदरम्यान मुलाखती होणार असून, इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी नोबेल फाउंडेशन, ख्वाजामियॉं दर्ग्यासमोर, गणेश कॉलनी रोड येथे त्यासाठी संपर्क साधावा. तसेच "सीईटी'ची पुस्तके महाग असतात. पालकांना पुस्तके खरेदी करण्याची आवश्‍यकता नसून विद्यार्थ्यांना "सीईटी'च्या संदर्भ पुस्तकांचे ग्रंथालय 24 तास अभ्यासासाठी विनामूल्य दिले जाईल. 

यंदा सर्वत्र दुष्काळी स्थिती असल्याने शेतकरी पालकांकडे पैसे नाहीत, म्हणून 50 विद्यार्थ्यांना भोजन सुविधा देऊन सामाजिक कर्तव्य पार पाडत आहोत. 
- जयदीप पाटील, संचालक, नोबेल फाउंडेशन, जळगाव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com