भाजप सरकार केवळ घोषणांची पार्टी : नवाब मलिक

भाजप सरकार केवळ घोषणांची पार्टी : नवाब मलिक

जळगाव ः भाजप सरकारने चार वर्षांत केवळ घोषणाच दिल्या. प्रत्यक्षात कोणतेही काम केले नसून, हे सरकार फसवे आहे. देशाच्या विकासासाठी ते कोणतेही काम करीत नसून, केंद्र व राज्यातील भाजप सरकार केवळ घोषणांची पार्टी आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. 
जळगाव महापालिका निवडणुकींतर्गत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शाहूनगरात झालेल्या सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष-आमदार 
डॉ. सतीश पाटील, राष्ट्रवादी प्रदेश अल्पसंख्याक अध्यक्ष गफ्फार मलिक, विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी यांच्यासह उमेदवार उपस्थित होते. मलिक म्हणाले, की कॉंग्रेसला महापालिका निवडणुकीत 75 जागांसाठी उमेदवार मिळाले नसल्याने त्यांनी केवळ 16 उमेदवार रिंगणात उतरविले. त्यामुळे लढाई फक्त राष्ट्रवादी व भाजपमध्येच होणार आहे. आमची सत्ता होती तेव्हा पेट्रोल व डिझेलच्या दराची तुलना करावी. कोणाच्या काळात पेट्रोल व सिलिंडर नागरिकांना स्वस्त पडत होते, याचा नागरिकांनी विचार करावा. आतापर्यंत भाजप, शिवसेनेने केवळ धर्माच्या नावावर राजकारण करून देशात अस्थिरता निर्माण करून ठेवली आहे. देश हा समानता व अहिंसेवर चालतो. जळगाव शहराचा विकास शिवसेना व भाजप यांच्यातील राजकारणामुळे झाला नाही. शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांना विजयी करून महापालिकेत एक हाती सत्ता द्या. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com