गिरणातून पाणी सोडण्याच्या तारखा जाहीर 

गिरणातून पाणी सोडण्याच्या तारखा जाहीर 

जळगाव ः गिरणा धरणातून चाळीसगावसह पाचोरा, भडगाव, जळगाव या तालुक्‍यांसाठी दर दोन महिन्यांनी पाणी आरक्षण सोडण्याचे ठरविण्यात आले आहे. त्याचबरोबर ते पाणी केव्हा सोडावयाचे त्या तारखाही कालवा समितीने निश्‍चित केल्या आहेत. 
या महिन्यात पाच नोव्हेंबरला आवर्तन सोडण्यात आले. आता पाच जानेवारी 2019 ला सोडले जाईल. असे दोन-दोन महिन्याच्या अंतराने पाणी सोडले जाणार आहे. मात्र तांत्रिक अडचणीमुळे पाणी सोडण्याच्या तारखेत दहा ते पंधरा दिवसांच्या वेळ अधिक लागू शकणार आहे. यामुळे या परिसरात निश्‍चित केलेल्या तारखांनाच पाणी सोडले जाईल असे गृहीत न धरता काही दिवस मागे पुढे होईल, असे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले. 
एक ऑक्‍टोबरला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली होती. त्यात खासदार ए. टी. पाटील, काही आमदारांनी गिरणेच्या पाण्यावर अगोदर जळगाव जिल्ह्याचा, त्यानंतर इतर जिल्ह्यांचा हक्क, असे सांगत या धरणातून पाणी केवळ जळगावलाच मिळाले पाहिजे, अशी आग्रही भूमिका मांडली होती. त्यामुळे गिरणा धरणातून पाणी सोडण्याबाबत मुंबईत बैठक झाली. त्यात अधिकाऱ्यांनी गिरणेच्या पाण्यावर इतरांच्या हक्काशिवाय जळगावला दर दोन महिन्यांनीच पाणी देणे शक्‍य असल्याचे सांगितले. त्यानुसार आता दर दोन महिन्यांनी गिरणा धरणातून पाणी सोडले जाणार आहे. 
 
आवर्तनाच्या तारखा अशा 
5 जानेवारी 2019 
5 मार्च 
5 मे 
5 जुलै 2019

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com