दहा कोटी रुपये खर्चूनही आदिवासींच्या जिवाशी खेळ सुरूच ! 

दहा कोटी रुपये खर्चूनही आदिवासींच्या जिवाशी खेळ सुरूच ! 

तळोदा : सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील तीनसमाळ रस्त्यावर ठेकेदाराच्या सुमार कामामुळे अपघातांची मालिका सुरूच असून, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कामाचे दहा कोटी रुपये खर्च करूनही आदिवासींच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे तीनसमाळ गावातील नागरिकांच्या यातना कधी संपणार व प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामातील भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांवर चौकशी होऊन कारवाई व्हावी व तीनसमाळ गावाचा विकासाचे आव्हान प्रशासनाने स्वीकारावे, अशी मागणी लोकसंघर्ष मोर्चाने केली आहे. 


याबाबत मोर्चाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, की प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या दहा कोटी रुपये खर्च करून तयार झालेला तीनसमाळ गावाचा रस्ता पूर्णतः खराब असून, ठेकेदाराने कामच केलेले नाही. ठेकेदाराने व संबंधित विभागाने केवळ आपली तिजोरी भरली असून, आदिवासींच्या जिवाशी खेळ सुरूच ठेवला आहे. मागील काळात तब्बल नऊ वेळा या रस्त्यावर वाहन अपघात होण्याचा घटना घडल्या आहेत. तरीही रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याची परिस्थिती आहे.

यासंदर्भात लोकसंघर्ष मोर्चाकडून पंतप्रधान कार्यालयात ऑनलाइन तक्रार प्रतिभा शिंदे, गणेश पराडके व तानाजी पावरा यांनी दाखल केली आहे. तर दुसरीकडे अतिदुर्गम गाव सरदार सरोवर धरणाच्या पाण्यामुळे चारही बाजूने वेढले गेले असून, टापू बनले आहे. या गावातील लोकांना वन्य प्राण्यांपासून धोका तर असतोच, मात्र गरोदर महिला आणि आजारी नागरिकांना अनेक किलोमीटर बांबूलन्सने धडगावला आणावे लागते. त्यामुळे या गावाच्या विकासाचे आव्हान प्रशासनाने उचलावे, अशी मागणी लोकसंघर्ष मोर्चाने केली आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com