शहराला तीन दिवसांआड पाणीपुरवठ्याच्या हालचाली 

शहराला तीन दिवसांआड पाणीपुरवठ्याच्या हालचाली 

जळगाव ः यावर्षी पाऊस कमी पडल्याने वाघूर धरणात केवळ 46.76 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. शहराला याच धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण होऊ शकते, त्यामुळे उपाययोजना म्हणून महापालिका प्रशासनातर्फे नियोजन करण्यात येत आहे. शहरात दोन दिवसांआड होणारा पाणीपुरवठा तीन दिवसाआड करण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनाकडून केल्या जात आहेत. 
राज्यात यंदा पाऊस कमी झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच जिल्ह्यातही कमी पाऊस झाल्याने पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्‍यता आहे. शहराला वाघूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सद्यस्थितीला वाघूर धरणात सप्टेंबरअखेर 46.76 टक्के पाणीसाठ्याची नोंद केली आहे. महापालिकेकडून शहराला दरवर्षी पाणीपुरवठ्यासाठी 40 एमएलडी पाण्याची मागणी असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या जिल्हा आढावा बैठकीत पाणीसाठा आढावा घेतला होता. तर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी देखील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आतापासून नियोजन करा, अशा सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाकडून पाण्याचे नियोजन केले जात आहे. 

पाणी जपून वापरा ः मंत्री महाजन 
सद्यस्थितीला शहरात दोन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु आता तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याच्या हालचाल सुरू झाल्या आहे. गुरुवारी मेहरुण चौपाटीवर रावण दहनाच्या कार्यक्रमाला जलसंपदमंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती होती. त्यामुळे त्यांनी वाघूर धरणाची पातळी कमी आहे. येथूनच जामनेरला देखील पाणीपुरवठा केला जातो, असे सांगत पाणी जपून वापरण्याचा सल्ला जळगावकरांना दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com