विश्वशांतीसाठी अहिंसा, करूणाभाव मोलाचाः राष्ट्रपती रामनाथ कोविंद 

residentional photo
residentional photo

मांगीतुंगी, : विश्वशांतीसाठी अहिंसा, करूणाभाव मोलाचा आहे. या आचरणाने जगात शांती प्रस्थापीत होईल. मानवासह निसर्ग व प्राणी पशु-पक्ष्यांसाठीही करूणाभाव गरजेचा आहे. अहिंसेची व्याप्ती मोठी आहे. दैनंदिन आचरणात हिंसा गैर. महाराष्ट्र सामाजीक सदभावना, अध्यात्म व संताची भूमी. संयम व सेवा मार्ग महत्वाचा. जैन धर्मात मानव कल्याणला महत्व असून, नैसर्गिक साधन संपत्तीचा संयमाने वापर करावा, असे आवाहन करतांना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अहिंसेला नवे आयाम दिले असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. 

मांगीतुंगी येथे आजपासून भगवान ऋषभदेव 108 फुटी मुर्ती कमिटीतर्फे सुरु झालेल्या तीन दिवसीय विश्वशांती अहिंसा संमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे होते. राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीष महाजन, गणिमी प्रमुख ज्ञानमतीजी, चंदनामतीमाताजी, पिठाधीश रवींद्रकिर्ती स्वामी, आमदार राजेंद्र पाटील आदी व्यासपीठावर होते.

श्री. कोविंद यांनी सर्वांना नमस्कार, जय जिनेंद्र या वाक्याने भाषणाला सुरुवात केली. यापुर्वी बिहारचा राज्यपाल असतांना भगवान महाविरांची जन्मभूमी कुंडलगाव व पावापुरीला जाण्याचा योग आला होता. आज भगवान ऋषभदेव मुर्ती कमिटीच्या कार्यक्रमानिमित्त येथे आलो. जैन धर्मात मानव कल्याणाला मोठे महत्व आहे. अध्यात्मिक, अहिंसा यातूनच मानवाचे कल्याण शक्य आहे. शांती व अहिंसा परस्पर पुरक आहे. नाशिकचे अध्यात्मिक महत्व मोठे आहे. येथे कुंभमेळा, शिर्डी, ञ्यंबकेश्‍वर यामुळे हे क्षेत्र धार्मिक पर्यटनासाठी अग्रणी आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचा संयमाने वापर करावा. येथील दुष्काळ गंभीर आहे. राज्य व विभागातील दुष्काळ निवारण कामात मुख्यमंत्री लक्ष घालतील.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, म्हणाले, भगवान ऋषभदेव यांच्या शासकाप्रमाणे काम करण्याची आम्हाला प्रेरणा मिळावी. करूणा, अहिंसा, मानवता धर्म सर्वश्रेष्ठ. मूर्ती पाहून करूणाभाव व विशालतम् विचारांना प्रेरणा मिळते. देशभरातील तिर्थकारांचे विचार प्रेरक. आहेत. आज विश्वशांतीसाठी अहिंसेचा पाठ गरजेचा आहे. व्यक्ती, जीवजंतु, प्राणी व पर्यावरणाची हाणी देखील हिंसाच आहे. आजच्या पर्यावरण असमतोलामुळे मानवता संकटात आली आहे. पर्यावरण संरक्षण करा. प्रकृतीचे त्यागाने सेवन करा भोगाने नव्हे. यापूर्वी मांगीतुंगी येथे 55 कोटींचे काम झाले. उर्वरीत कामे देखील लवकरच होतील. विश्वशांती भवनासाठी मुंबईत सिडकोच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून देवू. दुष्काळी परिस्थितीला केंद्राचे सहाय्य उपलब्ध होईल. राज्यात 179 तालुक्यात दुष्काळ जाहिर करू. त्यातून वीजबिलात सूट, परीक्षा शुल्क माफी, चारा-पाणी व्यवस्था यासह नऊ उपाययोजना अंमलात आणू. 

# दुपारी सव्वादोनला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे हेलीकाँप्टरने आगमन झाले. 
# दोन वाजून पंचवीस मिनिटांनी भगवान ऋषभदेव मूर्तीचे आगमन व परततांना हेलीकॉप्टरमधून दर्शन. 
# गिरधारीलाल अँण्ड सन्स इंदूरचा सुमारे 70 लाखाचा वाँटरप्रुफ मंडप.
# भजन सम्राट रूपेश जैन व वाद्यवृंदाने विविध भजन व गाणी सादर केली.
# सोहळ्यास राज्यातील विविध भागातून सकल जैन समाजाचे भाविक खासगी लक्झरी बसमधून आले. 
# आमदार राजेंद्र पाटणी प्रमुख अतिथींमध्ये खाली बसले होते. जिल्हाधिकारी राधाकुष्णन बी. यांनी त्यांना स्वत: सभास्थानी आणले.
# सोहळ्यात ज्ञानमती माताजी यांचा जयघोष करण्यात आला.
# राष्ट्रपती व अन्य नेत्यांनी पाऊणतास मूर्ती कमिटी पदाधिकारींची चर्चा केली.
# राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दीपप्रज्वलन करून विश्वशांती अहिंसा संमेलनाचे उद्‌घाटन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com