शेतकऱ्यांना मिळाले सघंटनांचे बळ; खतासाठी शेतकऱयांसोबत भाजप, बीटीएस आंदोलन करणार !

शेतकऱ्यांना मिळाले सघंटनांचे बळ; खतासाठी शेतकऱयांसोबत भाजप, बीटीएस आंदोलन करणार !

नंदुरबार ः पिकांना वाढीसाठी आवश्यक असलेल्या युरिया खताची मात्रा देण्याची वेळ आली आहे. एक एक दिवस लोटला जात आहे. मात्र शेतकऱ्यांना युरिया खत मिळत नाही, शेतकरी खत मिळविण्यासाठी विक्रेत्यांचा दारोदारी फिरून विनवण्या करीत आहेत. सकाळीपासून उपाशीपोटी खतासाठी रांगा लावत आहेत.त्यात अनेक ठिकाणी महिला व तरूणांना तासनतास रांगेत ताटकळत उभे राहवे लागत असल्याचे चित्र जिल्हाभर निर्माण झाले आहे. प्रशासनाने मात्र खत उत्पादक कंपन्यांकडून खतसाठा उपलब्ध न झाल्याने ही वेळ असल्याचे म्हणत हात वर केले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. आता शेवटी आंदोलनाचे हत्यार उगारण्याचा तयारीत शेतकरी आहेत. त्यांना नंदुरबार जिल्हा भाजप व बीटीएस संघटनेने बळ देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्याचा इशारा दिली आहे. 

वेळेवर पाऊस झाला, वेळेवर पेरण्या झाल्या, काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने पहिली पेरणी अंकुरावस्थेतच पावसाच्या पाण्यात वाहून गेली. त्यामुळे अनेकांना दुबार पेरणी करावी लागली. आता पिके हवेत डोलू लागले आहेत. अधून -मधून येणाऱ्या पावसाच्या सरीमुळे पिके हिरवीगार दिसू लागली आहेत.मात्र त्यांना आवश्यकता आहे ती पोषक तत्वे देण्याची, म्हणजेच वाढीसाठी युरियाचा डोस देण्याची वेळ आली आहे. एकीकडे कृषी विभागाने मागणीनुसार शेतकऱ्यांचा बांधावर खत पोहोचविण्याची ग्वाही दिली होती. मात्र ती नावालाच ठरली.असे असले तरी त्या योजनेला शेतकऱ्यांनीही फारसे गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे कृषी विभागानेही दुर्लक्षच केल्यागत झाले. अशा परिस्थितीत जिल्ह्यासाठी जून महिन्याकरिता साधारण २४ हजार मे.टन युरियाचा साठा नियोजित होता. मात्र तेवढा मिळालाच नाही. केवळ १६ हजार टन युरिया मिळाले. त्यामुळे विक्रेत्यांनाही कमी प्रमाणात वितरित झाले आहे. अर्थ साधारण ८ हजार मे.टनाची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे खत टंचाई म्हणता येणार नाही. मात्र गरजेपेक्षा कमी प्रमाणात म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला दहा गोणी गरज असेल तर त्याला सहा किंवा आठ गोणी खत मिळणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात तसे होत नसल्याचे चित्र आहे. सर्वाना थोड्या प्रमाणात का असेना, ते मिळाले पाहिजे.मात्र चित्र वेगळेच आहे. ठरावीक शेतकऱ्यांना खत मिळत आहे. अनेकांना विक्रेते हात वर करीत आहेत. त्यातून खताचा काळा बाजार सुरू झाला आहे. कोरोनामुळे कंपन्यांकडून उत्पादन होऊ न शकल्याने पूर्ण साठा मिळालेला नाही, असे कृषी विभाग आता स्पष्ट करीत आहे. त्यापेक्षा कृषी विभागाने आहे तो साठा सर्वाना कसा वाटप करता येईल, याचे नियोजन करणे आवश्यक आहे. 


भाजपचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

शेतकऱ्यांचे खतासाठी होणारे हाल पाहता, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी निवेदन सादर केले आहे. त्यात युरिया मिळविण्यासाठी शेतकऱ्यांचे होत असलेल्या अवस्थेचे वास्तव मांडले आहे. शेवटी शेतकऱ्यांना खत उपलब्ध न झाल्यास भाजप तीव्र आंदोलन करेल, असा इशारा श्री. चौधरी यांनी दिला आहे 
तसेच नवापूर येथेही जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित यांनी व बीटीएसचे अध्यक्ष के.टी. गावित यांनीही तहसीलदारांना निवेदन सादर करून आंदोलनाचा इशारा 
दिला आहे. 


(संपादीत- भूषण श्रीखंडे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com