दुष्काळाच्या चटक्यांनी करपली भातशेती, इगतपुरी - त्र्यंबकेश्वर तालुके संकटात

residentional photo
residentional photo

इगतपुरी : पावसाचे माहेरघर तथा महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणुन ओळख असुनही यंदा दुष्काळी परिस्थितीने इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकरी हताश झाला आहे.दुष्काळाने शेतकरी आणि शेती होरपळत असतानाही शासन यंत्रणा मात्र उदासीन आहे.पावसाने सरासरी देखील गाठलेली नसताना त्र्यंबकेश्वरचा दुष्काळ ग्रस्तांच्या यादीत समावेश झालेला नाही.
 

  भातशेती करणारा शेतकरी मात्र या दुष्काळात भरडला जात आहे.भात पिकाच्या अंतिम चरणात दुष्काळी परिस्थिती उदभवल्याने कही खुशी कही गमचे यंदा वातावरण उदभवले आहे  दोन्ही तालुक्याचे प्रमुख पिक असलेले भात उत्पादन जवळपास 60 ते 70 टक्के घटले आहे यावर्षी 2 हजार 500 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला असला तरी दरम्यानच्या कालावधीत अत्यंत तुरळक झालेल्या पावसाने सरासरी नोंदीत पाऊस अधिक दिसतो.मात्र परिस्थिती खुपच वेगळी आहे तसेच त्र्यंबक तालुक्यात ब्रह्मगिरी पर्वत रांगेत नद्यांच्या उग्मस्थानी कमी पाऊस झाला आहे.11 ते 22 जुलै असा सलग 11 दिवस बऱ्यापैकी पाऊस झाला 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com