पपईच्या दराचा गुंता पुन्हा वाढला 

papaya
papaya


शहादा : पपई उत्पादक संघर्ष समिती व व्यापाऱ्यांची दराबाबत आज रात्री उशिरापर्यंत बैठक झाली. व्यापारी दर कमी करण्यासाठी ठाम असल्याने तीत कोणताही तोडगा निघाला नाही. जे व्यापारी ११ रुपये ५ पैसे दराने पपईची तोड करतील, त्यांनाच शेतकऱ्यांनी पपई द्यावी; अन्यथा पुढील निर्णय होईपर्यंत पपईतोड बंद ठेवण्याचा निर्णय उपस्थित शेतकऱ्यांनी घेतला. पुढील निर्णय घेण्यासाठी उद्या (ता. ५) पुन्हा बैठक बोलाविण्यात आली आहे. 

हेही पहा - पीक कापणी अहवाल सादर; पीकविम्याची रक्कम लवकरच 

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पपईच्या दराबाबत तिढा सोडविण्यासाठी आज सायंकाळी बैठक घेण्यात आली. व्यापाऱ्यांनी बोलाविलेल्या या बैठकीत पपई उत्पादक संघर्ष समितीचे भगवान पाटील, दीपक पाटील, राजेंद्र पाटील, विजय पाटील, प्रमोद पाटील, उमेश पाटील, शंकर पाटील, राजाराम पाटील, अमोल पाटील, विशाल पाटील, अनिल पाटील, प्रफुल्ल पाटील व शेतकरी आणि व्यापारी प्रतिनिधी यांच्यामध्ये दराबाबत तिढा सोडविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. सध्या ११ रुपये ५ पैसे प्रतिकिलो याप्रमाणे दर सुरू आहे; परंतु व्यापाऱ्यांना हाही दर मान्य नसल्याने दर कमी करण्यावर व्यापारी ठाम होते. 
उत्तर भारतातील बाजारपेठेत दिवसेंदिवस भाव वाढत आहेत; परंतु शेतकऱ्यांना वेठीस धरून व्यापारी हा भाव कमी करत असल्याचा आरोप बैठकीत शेतकऱ्यांनी केला. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा दर कमी होणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले; परंतु व्यापारी दर कमी करण्यावर ठाम राहीले. अखेर बैठक फिसकटली. 
 
आज सर्वसाधारण सभा 
पपई दराबाबत उद्या (ता. ५) दराबाबतचा तोडगा काढण्यासाठी दुपारी चारला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघर्ष समितीतर्फे करण्यात आले आहे. 
 
व्यापाऱ्यांची अशीही चाल! 
शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी पपई उत्पादक संघर्ष समिती नेहमी पपई दराबाबत तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेते. मात्र, काही व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना उलटसुलट सांगून त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचे काम व्यापाऱ्यांमार्फत होत असल्याचे शेतकरी उमेश पाटील यांनी बैठकीत सांगितले. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांमध्ये फूट पाडू नये, असे सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी उद्या होणाऱ्या सभेसाठी हजर राहावे. आपली शेतकऱ्यांची एकजूट कायम ठेवावी, असे आवाहन पपई उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे भगवान पाटील यांनी केले आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com