नाशिक- सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीत एमआयडीसी मार्फत स्वतंत्र अग्निशमन केंद्राची स्थापना झाल्यानंतर आता उद्योजकांना खरी प्रतिक्षा आहे ती मलनिस्सारण केंद्राची. महापालिका एमआयडीसी कडे तर एमआयडीसी कधी महापालिकेवर जबाबदारी ढकलतं होती. आता अग्निशमन केंद्राची स्थापना झाल्यानंतर मलनिस्सारण केंद्र उभारण्याची जबाबदारी देखील एमआयडीसीची राहणार असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीची स्थापना झाल्यानंतर एमआयडीसीकडून उद्योजकांना प्लॉटचे वितरण करण्यात आले. रस्ते, पथदीप, पाणी पुरवठा तसेच अन्य पायाभुत सुविधा पुरविण्यात आल्या. रस्ते, पथदीप या सुविधा त्यानंतर महापालिकेच्या वतीने पुरविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. शहरात घंटागाडी सुरु झाल्यानंतर एमआयडीसी मधील कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र घंटागाडी महापालिकेच्या वतीने पुरविण्यात आली. एमआयडीसीला स्वतंत्र पाणी पुरवठा गंगापूर धरणातून होतो. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. दरवर्षी धरणातून 200 दशलक्ष घनफुट पाणी आरक्षित केले जाते. सध्या पाणी पुरवठा एमआयडीसीच्या वतीने पुरविला जातो. परंतू गेल्या तीस वर्षांपासून उद्योजकांच्या दोन मागण्या होत्या. त्यातील अग्निशमन केंद्राची मागणी आज पुर्ण झाली .पण आता मुख्यत्वे मलनिस्सारण केंद्राची मागणी अद्यापही एमआयडीसीकडे प्रलंबित आहे.
औद्योगिक वसाहतीत मलनिस्सारण केंद्र निर्माण करण्याची तयारी पुर्ण झाली आहे. पुढील दोन महिन्यात कामाला सुरुवात होईल असे आश्वासन उद्योग मंत्र्यांनी दिले आहे
.- शशिकांत जाधव, उपाध्यक्ष, निमा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.