पाण्याला लागलेल्या ग्रहणाची,जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल,कारवाईचे संकेत

residentional photo
residentional photo


नाशिक ः सुर्यग्रहणाच्या काळात त्र्यंबकेश्‍वरला पाणीपुरवठाच बंद ठेवल्याच्या प्रकाराची जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दखल घेतली आहे. वस्तुस्थितीची माहीती घेण्याचे निर्देश दिले आहे. अंधश्रध्दा पसरविण्याचा या तक्रारीची जिल्हाधिकाऱ्यांनीच दखल घेत तक्रारीत तथ्य आढळल्यास संबधितावर कारवाईचे संकेत दिल्याने, चौकशीच्या रडारवर आलेल्या त्र्यंबकेश्‍वरच्या गुरुवारच्या पाणीपुरवठ्याला मात्र ग्रहण लागले आहे. 
सुर्यग्रहण काळात गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवणाऱ्या त्र्यंबकेश्‍वर नगरपालिकेतील संबधितावर जादू टोणा विरोधी कायद्यार्तंगत कारवाईच्या मागणीसाठी आज शुक्रवारी (ता.27) महाराष्ट्र अंधश्रध्दा निमूर्लन समितीतर्फे उप जिल्हाधिकारी अरविंद नरसीकर यांना निवेदन देत चौकशीची मागणी केली. 

व्हॉटसअप संदेश व्हायरल

त्र्यंबकेश्‍वरला काल गुरुवारी (ता.27) सूर्यग्रहण असल्याने ग्रहण काळात पाणीवापर थांबविला गेला. नगरपालिकेच्या काही नगरसेवकांनी त्यासंबधीचे व्हॉटसअप संदेश व्हायरल केले होते. ग्रहण काळात जाणीवपूर्वक पाणीपुरवठा बंद ठेवण्याची नगरपालिकेची कृती श्रध्देच्या नावाखाली अंधश्रध्दा पसरवणारी आहे.

कारवाईची मागणी

अंधश्रध्देला प्रोत्साहान देत ज्यांनी पाणीपुरवठा बंद ठेवला अशा संबधितांवर कारवाई करावी ही अंधश्रध्दा निमूर्लन समितीच्या नाशिक शाखेची मागणी आहे. अंनिसचे राज्य सरचिटणीस प्रा. ठकसेन गोराने, समन्वयक कृष्णा चांदगुडे, सचिव महेंद्र दातरंगे, समीर शिंदे, राजेंद्र फेगडे, प्रल्हास मिस्त्रीनी आदीनी निवेदनाद्वारे केली आहे. 

कोट 
त्र्यंबकेश्‍वरला ग्रहण काळात पाणीपुरवठा बंद ठेवल्याच्या प्रकाराची चौकशी केली जाईल. तक्रारीत तथ्य आढळल्यास संबधितावर कायदेशीर कारवाई केली जाईल. 
- सूरज मांढरे (जिल्हाधिकारी नाशिक) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com