वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी वनविभागाकडून कृत्रिम वनतळ्यांची निर्मिती 

residentional photo
residentional photo

नाशिक : अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी नागरिकांबरोबरच वन्यजीवांनाही वणवण भटकावे लागत आहे. हेच लक्षात वनविभागाकडून वनक्षेत्रात कृत्रिम वनतळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. यात मालेगाव आणि येवला तालुक्‍यात जास्त कृत्रिम वनतळे तयार केली आहे. 

जिल्ह्यात पाण्याचे स्त्रोत आटत चालले आहे. त्यामुळे पाण्याची पातळी खाली गेलेली आहे. जिल्ह्यात135 टॅंकरद्वारे नागरिकांची तहान भागविली जात असून पशुधनाच्या पिण्याच्या पाण्यासाठी संबंधीतांना दूरदूर जावे लागत आहे. यातच वन्यजीवांना पाण्याअभावी नागरीवस्तीमध्ये येण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे वन्यजीवांना पिण्याच्या पाण्याची सोयीसाठी वनविभागाने पुढाकार घेत कृत्रिम वनतळे उभारण्यास प्राधान्य दिले. तीव्र दुष्काळाचा जळा सोसत असलेल्या येवला तालुक्‍यातील राजापूर येथे असलेल्या ममदापूर वनसंवर्धन क्षेत्रात मोर आणि हरणांची मोठी संख्या आहे. या पार्श्‍वभूमीवर वनविभागाकडून येवला आणि मालेगाव तालुक्‍यात वन्यजीवांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये,यासाठी सुमारे 45 कृत्रिम वनतळ्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. यात येवला तालुक्‍यात सर्वाधिक 25 कृत्रिम वनतळे तयार करण्यात आलेली आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com