उशिराच्या पावसामुळे रानभाज्याही बाजारात उशिराने....

residentional photo
residentional photo

खामखेडा-पावसाळ्यात ग्रामीण भागातील डोंगर पठार,व माळरानावर उगवणाऱ्या पौष्टिक रानभाज्या ठिकठिकाणच्या आठवडे बाजारात मिळू लागल्या आहेत.डोंगर आणि रानमाळावर उगवून येणाऱ्या या रानभाज्या विकून अनेक आदिवासी कुटुंबे चार पैसे मिळवतात.यावर्षी पाऊस थोडा उशिरा आल्याने ह्या भाज्या बाजारात उशिराने दाखल झाल्या असुन  सध्या ह्या भाज्यांचे चढे दर आहेत.

    पहिला पाऊस झाला की गवताच्या अगोदर रानभाज्या उगवतात.त्यामुळे त्यांची वाढ लवकर होत त्या लवकर बाजारात येतात.मात्र या वर्षी दमदार पाऊस नसल्याने ह्या रानभाज्या उशिरा उशिरा उगवल्यात.डोंगराळ भागात ज्या भागात पाऊस अधिक अशा सर्वत्र जंगल,माळरान परिसरात कोळू, भडदा, चाई, आंबटवेल, फांज, कांचन, शिंदरमाकुडा, रानज्योत आदी भाज्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर येतात..कळवण,सुरगाणा,दिंडोरी,त्रंबकेश्वर तशेच बागलाण तालुक्याच्या डोंगररांगानमधील जंगलात मोठ्या प्रमाणावर आढळतात.

  कळवण,अभोणा,कनाशी,डांगसौंदाणे,ताहराबाद,मुल्हेर,सटाणा यांसह आदिवासी भागातील बाजारांमध्ये दरवर्षी जुलैच्या महिन्यातच येतात.मात्र यावर्षी ह्या भागात उशिरा पाऊस झाल्याने सध्या ह्या भाज्या दाखल होऊ लागल्या आहेत. सध्या सर्वच भाजीपाल्यांचे भाव चढेच असल्याने विस ते पंचवीस रुपयांना एक याप्रमाणे जुडी विकली जात आहे. 
मुसळीची भाजी‘ ही आरोग्यवर्धक, बहुगुणी आहे.या भाजीचा हंगाम वर्षातून फक्त दोन-तीन आठवडे असतो सध्या ह्या भाजीला अधिकची मागणी आहे. 
       

वनौषधींचे व रानभाज्याचे  अभ्यासक  ह्या भाज्यांमधून कर्बोदके (कार्बोहायड्रेट) ,प्रथिने,सॅपोजेनिन, सॅपोनिन,सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम,जस्त, तांबे आदी खनिजे विपुल प्रमाणात असतात.त्यामुळे ह्या भाज्या बलवर्धक,शक्तिवर्धक,त्रिदोषहारक असतात.त्यामुळे ह्या भाज्यांच्या सेवनाने अनेक आजार बरे होतात.म्हणुन शहरी भागातील सुशिक्षित ,नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणावर रानभाज्या आहारात वापरतात. 
 
रानभाज्याच्या आहारातील वापरनयने आरोग्यदायी फायदे अधिक असल्याने ह्या भाज्यांचा पावसाळ्यात आहारात अधिक वापर करत असतो.
सुनिता प्रकाश शेवाळे,गृहिणी नाशिक.
 
रानभाज्या दुर्मिळ होत चालल्याने त्यांचा वापर आहारातून कमी होत चालला.व त्यामुळे पावसाळ्यात ह्या भाज्यांचा अधिक आहारात उपयोग करत असतो.
डॉ कुलदीप जाधव,सटाणा

पावसाळ्यात डोंगरउतारावर ह्या भाज्यांचा दिवसभर शोध घेत त्या गोळा कराव्या लागतात.ह्या वर्षी पावसाळा उशिरा झाल्याने उशिरा बाजारात दाखल झाल्या आहेत.यापासून पावसाळ्यात हाताला काम नसतांना रोजगार मिळत आर्थिक  हातभार लागतो.
पंडित गांगुर्डे,जयदर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com