पाणी सोडता का? पालखेडचे दरवाजे खुले करू, छगन भुजबळ यांचा इशारा 

residentional photo
residentional photo

नाशि ः पालखेड धरणातून आवर्तन देण्याची मागणी करूनही प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने शनिवारी (ता. 17) माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना भेटणार आहेत. गुरुवार (ता. 15)पासून आवर्तन द्यावे, अशी भुजबळांची मागणी होती. मात्र अजूनही कालवा सल्लागार समितीची बैठकच न घेतल्यामुळे आवर्तनाबाबत संभ्रम निर्माण होऊन शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण आहे. प्रशासनाने पाणी न सोडल्यास शेतकऱ्यांसोबत धरणावर जाऊन आपण धरणाचे दरवाजे खुले करण्यात येतील. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास यासाठी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला. 

पालखेड डावा कालव्याच्या भरवशावर दिंडोरी, निफाड व येवला या लाभक्षेत्रांतील शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम केला आहे. शेतकऱ्यांनी प्रामुख्याने ठिबक सिंचनाचा वापर करून द्राक्ष, डाळिंब यांसह इतर रब्बीची पिके घेतली आहेत. येवला व निफाड तालुक्‍यांतील शेतकऱ्यांनी कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. कांदा हे नगदी पीक असल्याने पाण्याअभावी शेतकऱ्यांची अपरिमित हानी होत आहे. शेतकऱ्यांची उभी पिके जळू लागली आहेत. त्याचबरोबर येवला, निफाड तालुक्‍यांसह मनमाडला पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com