विवाह जुळविणाऱ्यांना आला मान 

Marriage
Marriage

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : मार्च महिना अर्ध्यावर संपत आला तरीही बहुतांश विवाहोत्सूक तरुण- तरुणींचे विवाह जुळत नसल्याने पालक चिंताग्रस्त झाले आहेत. विवाह जमविणाऱ्या संस्थांसह मध्यस्तींकडे विशेषतः युवकांचे ‘बायोडाटा’ जमा होताना दिसत आहेत. हल्ली मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढल्याने तसेच विवाहोत्सुक मुलींसह त्यांच्या पालकांच्या अपेक्षा वाढल्याने अनुरूप जोडीदार मिळणे कठीण होत आहे. 

मुलींना अपेक्षित आसलेल्या शासकीय किंवा निमशासकीय नोकरी करणाऱ्या मुलांची स्थळे पाहिजे त्या प्रमाणात येत नसल्याने व दुसरीकडे मुलीच्या वाढत्या वयामुळे पालक चिंताग्रस्त झाले आहेत. समाजा - समाजात वधू- वर निवडी संदर्भात मोठ्या प्रमाणावर प्रबोधन होत असले, तरीही प्रत्यक्षात मात्र वेगळीच वस्तुस्थिती आजही कायम आहे. काही तरुण पदवीधर असूनही नोकरीअभावी बेरोजगार आहेत. काहींनी तर खाजगी नोकरी करूनच समाधान मानत आहेत. विविध व्यवसाय व शेती करणाऱ्या युवकांच्या विवाहाबाबतीत सध्या खूपच हाल होताना दिसत आहे. या सर्व परिस्थितीमुळे समाजा समाजातील विवाह जुळवणाऱ्या मध्यस्थांकडे युवकांचे बायोडाटा मोठ्या प्रमाणावर जमा होत आहेत. 

शहरासारखी वधूवर सूचक मंडळात नावे नोंदण्याची पद्धत आता ग्रामीण भागातही येऊ पाहत आहे. दहा ते बारा वर्षापूर्वी उपवर मुलामुलींचे विवाह फारशा अडचणी येत नव्हत्या. पालकच इतर सर्व निर्णय घेऊन मुला- मुलींवर पसंतीचा निर्णय सोपविताना दिसत आहेत. मुलाच्या घरची परिस्थिती, त्यांचे वागणे, घरातील माणसे, शेती- नोकरी व्यवसाय आदी बाबीचा प्राधान्याने विचार केला जात होता. हुंडा व मानपानाचा पगडा असल्याने ठरावीक वयातच मुलीचे लग्न झाले पाहिजे, अशी मानसिकता असल्याने मुलांपेक्षा मुलीकडेचेच लोक स्थळे शोधण्यात पुढाकार घ्यायचे. 

मुलीची शिकण्याची तयारी असली, तरी माहेरच्यांना त्याचा फायदा काय? सासरकडचे लोक शिकवतील, अशी धारणाही होती. त्यामुळे जवळचे दुरचे नातेवाईक मित्राकडून माहिती घेऊन विवाह जुळवित आसत. मुलगी म्हणजे ओझे किंवा परक्याचे धन ही भावना पूर्वीपासून आसल्याने या जुनाट विचार सरणीमुळे गेल्या काही वर्षात गर्भलिंग चिकित्सेचा सुळसुळाट झाला. मुलगी आहे असे समजताच तिची गर्भातच तिची हत्या करण्याचे प्रकारामुळे मुलांच्या प्रमाणात मुलींची संख्या दिवसें दिवस कमी होताना दिसत आहे. काही समाजामध्ये मुलांना समाजातील अनुरुप जोडीदार मिळत नसल्याने बहुतांश पालकांसह स्वतः मुलांनी सोलापूरकडील मुलींशी विवाह केले आहेत. यात काहीची फसवणूक झाल्याचेही प्रकार घडले आहेत. 

बदलत गेलेली मानसिकता 
सध्या तंत्रज्ञानाचा झपाट्याने प्रसार झाल्याने आठरा वर्ष वय पूर्ण झाल्याशिवाय तसे कायद्याने बंधन आसल्याने मुलीच्या लग्नाचा विचार कोणीही करीत नाही. वाहतुकीची साधने शिक्षणामुळे झालेली जनजागृर्ती यामुळे मुलीही डॉक्टर, इंजिनीयर, वकील, एमबीए, पोलिसदल आदी क्षेत्रात चमकत आहेत. विशेष म्हणजे मुलांपेक्षा त्यांना जास्त गुण मिळत आहे. यामुळे दिवसे दिवस पालकांचीही मानसिकता बदलताना दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com