नारपार प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावला : गिरिश महाजन

mahajan
mahajan

नांदगाव : जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी छावण्यांऐवजी डेपो सुरु करण्याच्या बाबतचा निर्णय येत्या दोन दिवसात घेतला जाणार असल्याची ग्वाही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. शाश्वत स्वरूपाचे पाणी मिळण्यासाठी नदीजोड प्रकल्प हाच एकमेव पर्याय असून म्हणूनच पंधरा वर्षांपासून धूळ खात पडलेली नार पार प्रकल्पाची फाईल मार्गी लावण्यात आली असून त्यासाठी निधीची कसलीही अडचण येणार नसल्याचे आश्वासन पालकमंत्री महाजन यांनी दिले.

नारपार प्रकल्पामुळे जिल्ह्यातील दुष्काळाचे चित्र बदलले असेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला निवडणूक आचारसंहितेमुळे शासकीय अधिकारी दौऱ्यात सहभागी होत नसल्याने नेमकेपणाचा निर्णय घेण्यास अडचण येऊ नये यासाठी निवडणूक आयोगाशी बोलणे झाले असल्याने यंत्रणेच्याबाबतची अडचण दूर झाल्याची माहिती त्यांनी दिली. दुष्काळ दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री गिरीश महाजन यांचे आजही चार तास उशिराने आगमन झाले. तोवर त्यांच्यासाठी बाणगाव-खिर्डी येथे नागरिक तिष्ठत बसून होते.

अखेर राजपरहून सांयकाळी उशिरा त्यांचे आगमन झाले बाणगाव येथील महादेव मंदिराशेजारील ग्राम पंचायतीच्या सभागृहात पालकमंत्र्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी पालकमंत्री महाजन यांचे स्वागत करतांना रोहिणी नक्षत्र पंधरा दिवसाच्या तोंडावर येऊन ठेपले असून दुष्काळाच्या प्रश्नावर यंत्रणेला गती मिळाली नसल्याचे त्यांनी महाजन यांच्या निदर्शनास आणून दिले टँकरची संख्या वाढविणे,शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी व पुढील हंगामासाठी बी बियाणे जनावरांचा चारा व पाणी या महतवाच्या समस्या जाणवणार असल्याचे सांगितले जनावरांसाठी प्रति हेक्टर पंचवीस हजार किंवा बैलजोडीस दहा हजार रुपये चाऱ्यासाठी द्यावे अशी मागणीबाणगाव -खिर्डी पंचक्रोशीतल्या शेतकऱ्यांच्या वतीने बापूसाहेब कवडे यांनी पालकमंत्री महाजन यांच्याकडे केली.

जनावरांसाठी पाण्याचे टँकर देण्यात यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली लोकसभा निवडणुकीत केंद्रात पुन्हा नरेंद्र मोदी यांचे सरकार येणार असल्याने नांदगाव तालुक्यासह जिल्ह्यातीलअनेक प्रश्न मार्गी लागणार असल्याचा दावाही त्यांनी केला. माजी आमदार संजय पवार यांनी ४२ खेडी नळयोजनेतून पाणी मिळत नाही जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली लोकसभेतील उमेदवार डॉक्टर भारती पवार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव,माजी आमदार राजाभाऊ देशमुख,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रत्नाकर पवार, तालुका पंच्यात समितीच्या सभापती सौ विद्या पाटील,नगराध्यक्ष राजेश कवडे,भाजपाचे तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड,शिवसेनेचे तालुकाप्रमुख किरण देवरे बाजार समितीचे सभापती तेज कवडे मनमाडच्या माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक सुनील पाटील गंगादादा त्रिभुवन भाजपचे जेष्ठ नेते सजनतात्या कवडे,प्रफुल्ल पारख पंकज खताळ,सुभाष कुटे विष्णू निकम,भाऊसाहेब हिरे गणेश शिंदे,संजय फणसे विठ्ठलआबा  आहेर इत्यादी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com