मुक्ताईनगर येथे "ओडीए'अंतर्गत  22 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद 

मुक्ताईनगर येथे "ओडीए'अंतर्गत  22 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद 

मुक्ताईनगर येथे "ओडीए'अंतर्गत 
22 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद 
 
जळगाव ः मुक्ताईनगर परिसरात "ओडीए' योजनेंतर्गत 50 गावांचा पाणीपुरवठा गेल्या 22 दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे, अशी तक्रार माजी मंत्री व आमदार एकनाथराव खडसे यांनी पालकमंत्री पाटील यांना केली. तोच धागा पकडत आमदार सावकारे यांनी पाणीपुरवठा योजनेंतर्गत अनेक कंत्राटदारांची कामे संथगतीने सुरू असल्याची तक्रार केली. त्यावर पालकमंत्री पाटील यांनी दुष्काळामुळे टंचाई अधिक राहील. यामुळे मागेल त्या गावांना टॅंकर द्या. थकबाकी असल्याने वीजपुरवठा खंडित करू नका, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. 
टंचाईकाळात विजेचे संयोजन त्वरित द्या, जिल्हाधिकाऱ्यांनी दर आठवड्याला पाणीटंचाई, चाराटंचाई, वीजटंचाई याबाबत लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची सूचना केली. मुक्ताईनगर परिसरात जंगलाचा अधिक भाग असल्याने तब्बल आठ वाघ आहेत. जंगलातील पाणी संपले, की ते मानवी वस्तीकडे येतात. हल्ले करतात. यामुळे वन विभागाने जलयुक्तच्या कामांमध्ये वन विभागात असलेली पाण्याची ठिकाणे अधिक खोल करून त्यात पाणी राहील अशी व्यवस्था करावी, असे सांगितले. रात्री वीज नसल्याने शेतकरी घराबाहेर पडत नाहीत. वीज कंपनीने किमान रात्री तरी वीज द्यावी, अशी सूचना केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com