वाडीवऱ्हे (जि. नाशिक) : इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील चार शेतकऱ्यांना बियाणे कंपनीने बोगस बियाणे पुरवल्याने पूर्ण हंगामाचे नुकसान झाल्याने अकरा वर्ष न्यायालयात कायदेशीर लढा देऊन बियाणे कंपनीकडून आठ लाखांची भरपाई मिळवली आहे.
कांचनगाव, दौडत, बेलगाव तऱ्हाळेच्या शेतकऱ्यांनी २०११ मध्ये बायो सिड्स कंपनीकडून आटल वाणाच्या टोमॅटोचे बियाणे घेऊन लागवड केली. पिकाला वेळेवर पाणी दिले, खते टाकली मात्र फळधारणाच झाली नाही. शेतकऱ्यांनी बियाणे विक्रेत्याच्या माध्यमातून पिकाची पाहणी करुन नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केली. कंपनीने भरपाई देण्यास टाळाटाळ केली होती.
शेतकऱ्यानी कायदेशीर सल्लागार लक्ष्मण तात्या गव्हाणे, ॲड.शंकर संतू शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयात नुकसान भरपाईचा दावा दाखल केला. बियाणे कंपनीने लढा सुप्रिम कोर्टापर्यंत नेला. शेतकऱ्यांनीही चिकाटीने अकरा वर्षे न्यायालयात लढा दिला. कायदेशीर लढाई अकरा वर्षानी यशस्वी झाली. प्रवीण सुखदेव गव्हांणे व हारी गणपत गव्हाणे (रा. कांचनगाव, मंजुर भरपाई रक्कम, ५ लाख २६ हजार ४६०), तुकाराम शिंदे (रा. दौंडत, भरपाई मंजूर रक्कम २ लाख ३८ हजार ३५०), अनिल वारुंगुसे (रा. बेलगाव तऱ्हाळे, मंजूर भरपाई २७ हजार ३५०) या चार शेतकऱ्यांना ७ लाख ९२ हजार १६० नुकसान भरपाई मिळाली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.