अघोषित भारनियमनामुळे नाशिककर हैराण; तासनतास वीजपुरवठा खंडित

electricity
electricityesakal

नाशिक : जुने नाशिक सह शहराच्या विविध भागात दुपार, तसेच सायंकाळी तासनतास वीजपुरवठा खंडित होत आहे. नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अघोषित भारनियमन केली जात असल्याचे भासत आहे. वीजवितरण विभागाकडून याकडे लक्ष देत वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (Nashik-residents-harassed-due-to-unannounced-Loadshedding-nashik-marathi-news)

तासनतास वीजपुरवठा खंडित

सध्याची प्रत्येक गोष्ट विजेवर अवलंबून आहे. असे असताना तासनतास वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहे. कधी स्मार्टसिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामामुळे, तर कधी पावसाच्या निमित्ताने वीजपुरवठा खंडित होत असल्याचे वीज वितरण विभागाकडून सांगितले जाते. सध्या इतकाही पाऊस होत नाही, की वीजपुरवठा खंडित करण्याची आवश्यकता आहे. असे असताना कुठल्या कारणांमुळे त्यांना वीजपुरवठा खंडित करावा लागत आहे. हे त्यांनाच माहीत. कोरोनामुळे शाळा, महाविद्यालय बंद आहे. ऑनलाइन विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. त्यासाठी लॅपटॉप, संगणक, टॅब आणि स्मार्ट मोबाईलचा अधिक वापर होत आहे. अशा वेळेस त्यांची बॅटरी काही वेळातच संपण्याची प्रमाण वाढले आहे. यासाठी विजेची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर भासत आहे. तासनतास होणाऱ्या भारनियमनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात व्यत्यय येत आहे. शिवाय अनेक रुग्णालयातील वीजपुरवठाही खंडित होत असल्याने रुग्णांनादेखील अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कुठलीही अनुचित घटना घडू नये. यासाठी वीज वितरण विभागाने लक्ष देऊन वीजपुरवठा नियोजन करावे. जेणेकरून वारंवार तासनतास वीजपुरवठा खंडित होणार नाही.

वृक्षांच्या फांद्यांची छाटणीचे काम सुरू असल्याने वीजपुरवठा खंडित

पावसाळ्यात वृक्ष किंवा वृक्षांच्या फांद्या कोसळून वीज पुरवठा खंडित होत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे वृक्षांच्या फांद्यांची छाटणीचे काम सुरू असल्याने देखील वीजपुरवठा खंडित होत असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र असे कामे कुठेही होताना दिसत नाही आणि जर होत असतील तर पावसाळ्यापूर्वी ही कामे होणे आवश्यक होत आहे. तसे झाले नसल्याने त्याचा परिणाम नागरिकांना सोसावा लागत आहे. सध्या वीजपुरवठादेखील जीवनदायी ठरत आहे. त्यामुळे वीज वितरण विभागाने वीज पुरवठा वारंवार खंडित होणार नाही. याची काळजी घ्यावी, अशी मागणी नागरिक करत आहे.

वीज वितरण विभागाच्या अनागोंदी कामाचा परिणाम सामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. वीजपुरवठा खंडित होणार नाही, याचे नियोजन विभागाने करावे. - गणेश बर्वे

electricity
हॉलमार्कच्या सक्तीने ग्राहकांना फायदा; बिनधास्त सोने खरेदी
electricity
शेकडो प्रवाशांचा जीव वाचविणारा 'देवदूत'!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com