नरकोळ (जि. नाशिक) : कसमादे पट्ट्यात यंदा कांद्याचे पीक जोमदार आहे. परंतु गेल्या तीन चार दिवसापासून पडणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. या ढगाळ हवामानाचा चांगलाच धसका शेतकरी यांनी घेतला आहे. अत्यंत कष्टातून उभारलेले हे पीक ढगाळ वातावरणामुळे खराब होण्याची भिती निर्मिण झाली आहे. (Onion growers worried about cloudy weather nashik news)
हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल
कांदा लागवडीपासून तर काढणीपर्यंत मोठे कष्टाचे पीक आता झालेले आहे. गेल्या आठ दिवसापासून ढगाळ वातावरण, धुके व सकाळी दव पडत असल्यामुळे कांदा पिकाचे नुकसान होते की काय? या काळजीत कांदा उत्पादक आहेत.
या पिकाला नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी वेगवेगळ्या कंपनीचे फवारणी करून पीक वाचवण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत.
यावर्षी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कांद्याला भाव मिळतो की नाही, ढगाळ हवामान हे पीक येऊ देते की नाही? अशी दुरावस्था शेतकऱ्यांची झालेली आहे. या पट्ट्यात खरीप हंगामात मका तर रब्बी हंगामात कांदा हे महत्त्वाचे पीक झाले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.