Abdul Sattar: 25 मार्चपर्यंत शेतकरी मदतीचा निर्णय : अब्दूल सत्तार

abdul sattar
abdul sattarsakal

रेडगाव खुर्द : अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय २५ मार्च पर्यंत घेतला जाईल असे आश्‍वासन कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांनी नुकसानग्रस्त पीकपाहणी दौऱ्यात उपस्थित शेतकऱ्यांना दिले.

पन्हाळे (ता. चांदवड, जि.नाशिक) येथे नुकसानग्रस्त पिकांची पाहणी दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

abdul sattar
Nashik Crime News : सावरकरनगरमध्ये सराफी पेढीवर डल्ला; दुर्लक्षामुळे 25 लाखांचे दागिने चोरीला

श्री. सत्तार म्हणाले, की शेतकऱ्यांचे नुकसान मोठे आहे, या नुकसानीच्या क्लिप मी टीव्ही आणि मोबाईलवर बघितली आहे. मात्र मदतीचा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही. तुमच्या व्यथा आणि भावना मी मुख्यमंत्र्यांपर्यंत नक्की पोचवणार असून २५ तारखेच्या आत शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत नक्की होईल. मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही. यासाठी अधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ आणि वास्तव पंचनामे करण्याच्या स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना दिल्या.

१७ मार्च रोजी तालुक्यातील पन्हाळे व पंचक्रोशीत वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी मंगळवारी (ता.२१) केली. यावेळी विजय कुंभार्डे, सूर्यभान वाघ यांनी मंत्र्यांसमोर शेतकऱ्यांची कैफियत मांडत मोफत कांदा बियाणे, जिल्हा बँकेकडून ठेवीतून कर्जवाटप आणि पन्हाळे गाव मंत्र्यांनी दत्तक घ्यावे यासह विविध मागण्या मांडल्या.

हेही वाचा: एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

यावेळी सर्वप्रथम अब्दूल सत्तार यांनी उशिरा आल्याबद्दल शेतकऱ्यांकडे दिलगिरी व्यक्त केली. याप्रसंगी जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, भाजप तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, डॉ. नितीन गांगुर्डे, वर्धमान पांडे, सरपंच बाबूराव कुंभार्डे, उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार प्रदीप पाटील, गटविकास अधिकारी महेश पाटील, कृषी अधिकारी विलास सोनवणे, यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

abdul sattar
Nashik News : ZP ग्रामीण पाणीपुरवठा विभागात सावळागोंधळ! एकाच अभियंत्यांकडे तीन-तीन विभागांचा पदभार

तीन महिन्यासाठी कांदा अनुदान द्या : डॉ. कुंभार्डे

शेतकऱ्यांच्यावतीने माजी जि.प. सदस्य डॉ.आत्माराम कुंभार्डे यांनी मंत्र्यांपुढे सगळ्या नुकसानीचा घोषवारा ठेवला. राज्य शासनाने कांद्याला ३५० रुपये अनुदान जाहीर केले. मात्र कालावधी निश्चित नसल्याने शेतकरी संभ्रमात आहे. त्यामुळे सरकारने निर्णय घेताना जानेवारी ते मार्च या तीनही महिन्यांचा समावेश करावा अशी मागणी केली. तसेच पन्हाळे गावासाठी विशेष पॅकेज मंजूर करावे अशीही मागणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com