नरकोळ : जिल्ह्यात मागील काही दिवसापासून अवकाळी पावसाने कहर केल्यामुळे शेतकरी आता काळजीत पडला आहे. गहू, हरभरा ऐन सोंगणी मळणीच्या वेळेस वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाच्या तडाख्यामुळे अडथळा निर्माण झाला असून पाऊस धुके, ढगाळ वातावरण, याचा फटका आंब्याच्या मोहरवरही दिसून आला आहे.
अवकाळीमुळे गावठी आंब्याचा गोडवा कमी होणार असून यावर्षी आंबाच उत्पादन घटणार असून लोणच्याची कैरीचा दर कडाडणार आहे.
हेही वाचा: एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
अवकाळी पावसाने मोसम खोऱ्यातील बहुतांश आंब्यांना फक्त दांडा शिल्लक राहिलेले आहेत. मोहर गळाल्याने आंब्याचा गोडवा कमी दिसणार आहे. गावठी कैरी प्रामुख्याने लोणच्यासाठी वापरल्या जातात . यामुळे कैरी महागणार आहे. शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर आंब्याची झाडे आहेत. काही शेतकऱ्यांच्या आंब्याच्या बागा देखील आहेत. परंतु आंब्याच्या झाडाला फुटलेला मोहर सध्याच्या हवामानामुळे धोक्यात सापडलेला आहे.
नोव्हेंबर, डिसेंबर या कालावधीत आंब्याला मोहर येण्यास सुरवात होते. डिसेंबर महिन्यात थंडीमुळे आंबा चांगला फुलतो. अवकाळीचे ग्रहण सुटत नसल्याने शेतकऱ्यांना या वातावरणाची रोजची धास्ती आहे. काही शेतकऱ्यांनी आंब्यांच्या झाडाला मोहर फुटल्यानंतर फवारणी करून फळ वाचविले. परंतु अवकाळी पावसामुळे पुन्हा आंब्यांचे नुकसान झाले.
हवामानाने मोहर हा गळालेल्या अवस्थेत दिसत आहे. काही ठिकाणी आंबेमोहर काळपट पडलेला आहे. आंब्यांचे नुकसान होत असल्यामुळे उन्हाळ्यात येणाऱ्या आंब्याच्या उत्पन्नावर परिणाम होईल. आदिवासी भागात आंबे विक्रीतून दोन पैसे मिळतात. त्यांनाही अनेकांना मुकावे लागणार आहे. शहरात या गावठी आंब्यांना मोठी मागणी असते.
''वर्षातून एकदा येणारे आंबा पीक यंदा प्रचंड प्रमाणात बहरले होते. परंतु अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे मोहर गळून पडल्याने आंब्याच्या उत्पन्नावर परिणाम होईल, यातून दोन पैसे मिळाले असते. परंतु अवकाळीने उत्पन्नालाही फटका बसणार आहे.'' - काशिनाथ सोनवणे, नरकोळ, ता. सटाणा
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.