आता भाकरी फिरवण्याची वेळ आली : अमोल कोल्हे

Amol Kolhe
Amol Kolhe

गंगापूर : पारदर्शी सरकार म्हणून जनतेची दिशाभूल करत भाजप सरकार सत्तेत आलं, मात्र, जनतेची पूर्णपणे निराशा झाली आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीत भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे," असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी येथे केले.

बुधवारी (ता. सात) गंगापूर शहरात शिवस्वराज्य यात्रेनिमित्त ते बोलत होते. याप्रसंगी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना डॉ, कोल्हे म्हणाले, "रयतेचे राज्य पुन्हा आणण्यासाठी ही राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. राष्ट्रवादी पक्षातून काही नेते बाहेर पडले असतील पण बुरुज ढासळल्याने किल्ला पडत नाही. पानगळ सुरूच असते पण त्यानंतर एक नवी पालवी निर्माण होत असते हे पण विसरून चालणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः मीच मुख्यमंत्री होणार असल्याचे जहागीरी असल्या सारखे सांगत आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवण्याचा पूर्णपणे अधिकार महाराष्ट्रातील जनतेचा आहे."  तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी, जातीजातीमध्ये तेढ कमी करण्यासाठी अठरा पगड जातींना सोबत घेऊन ही यात्रा काढली असल्याचेही कोल्हे यावेळी म्हणाले. 

३७० कलम बाबत बोलताना ते म्हणाले की, चांगल्या निर्णयाचे समर्थनच आहे. पण त्या प्रश्नाने तुमच्या घरात भाकर येणार आहे का ? तुम्ही किती पैसे कमवले हा प्रश्न सुटणार आहे का? असा सवालही कोल्हे यांनी केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com