नाशिक - कांद्याच्या दरात चोवीस तासांपूर्वी ३०० ते ४५० रुपयांची घसरण झाली. गुरुवारच्या (ता. १०) तुलनेत आज दर पुन्हा २०० ते ४०० रुपयांनी गडगडले. दरातील घसरणीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रोज दहा कोटींचा दणका बसत आहे. कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे अगोदर क्विंटलला एक हजाराने भाव गडगडले होते. त्यात सरासरी पावणेसातशे रुपयांची भर पडली.
किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांसाठी साठवणुकीचे निर्बंध केंद्र सरकारने घालून दिले आहेत. त्यामुळे व्यापारी कांदा खरेदीचा धोका पत्करत नाहीत.
त्यात किरकोळप्रमाणे घाऊक व्यापाऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील बाजारपेठेत दिवसाला साठ ते सत्तर हजार क्विंटल कांदा शेतकरी विक्रीसाठी आणीत आहेत. जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठांचा कानोसा घेतल्यावर व्यापारी सरकारची नाराजी येऊ नये म्हणून जुजबी कांदा खरेदी करत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. काही व्यापाऱ्यांनी आपल्या पेढीची लिलावातील हजेरी कायम ठेवली असली, तरीही गेल्या आठ दिवसांपासून लिलावाकडे न फिरकणे पसंत केले आहे.
देशांतर्गत आजचा दर (क्विंटलला रुपयांमध्ये)
३४०० बंगळूर
३७०० चेन्नई
३६०० पाटणा
३३७५ सुरत
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.