..दहा एमएलडी पाण्याची  उचल होईल कमी 

..दहा एमएलडी पाण्याची  उचल होईल कमी 

..दहा एमएलडी पाण्याची 
उचल होईल कमी 

जळगावः शहराला वाघूर धरणातून महापालिकेतर्फे दोन दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. परंतु, यंदा दुष्काळाचे सावट, तसेच धरणातील साठा कमी असल्याने चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिकेस पत्र दिले होते. त्यानुसार फेब्रुवारीपासून तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिकेकडून केले जात आहे. सध्याच्या दोन दिवसांआड होणाऱ्या पुरवठ्यासाठी दररोज 90 एमएलडी लागते, तेच तीन दिवसाआड केल्यास 10 एमएलडीची पाण्याची उचल कमी होणार आहे. 
शहराला महापालिकेतर्फे वाघूर धरणातून दोन दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. परंतु, यावर्षी कमी पाऊस पडल्याने जळगावकरांवर पाणीकपातीचे संकट उभे ठाकले आहे. सद्य:स्थितीत वाघूर धरणात 32 टक्‍के साठा आहे. पावसाळ्याला पाच महिने बाकी असून, धरणातील साठा आरक्षणानुसार सर्वांना मिळावा, यासाठी धरणातील पाण्याचे नियोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाणीटंचाई विभागाकडून केले जात आहे. त्यानुसार महापालिकेला चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार महापालिकेचा आरक्षित हिस्सा हा 40 दशलक्ष घनमीटर असून, दोन दिवसांआड होणारा पाणीपुरवठा केल्यास दररोज 90 4एमएलडी पाण्याची उचल होते. परंतु, तीन दिवसांआड पाणीपुरवठा केल्यास 90 एमलएलडी पाण्याची उचल न होता 80 एमएलडी पाण्याची उचल होईल. त्यामुळे 10 एमएलडी पाण्याची कमी उचल होणार आहे. 

फेब्रुवारीपासून तीन दिवसांआड पाणी 
महापालिका प्रशासनाकडून वाघूर धरणातून वार्षिक 240 दशलक्ष घनमीटर एवढी मागणी आहे. परंतु, धरणात साठा कमी असल्याने उन्हाळ्यात पाणी पुरावे, यासाठी महापालिकेकडून पाणीपुरवठ्याबाबत तीन दिवसांआड करण्याचे नियोजन केले जात आहे. त्यानुसार 1 फेब्रुवारीपासून पाणी पुरवठा होण्याची शक्‍यता आहे. 

चार टप्प्यांत शहराचे वेळापत्रक 
जळगाव शहरातील पाच लाख लोकांना दोन दिवसांआड एक तास पाणीपुरवठा तीन टप्प्यात विभागून केला जातो. त्यानुसार आता तीन दिवसांआड पाणीपुरवठा वेळ न कमी करता केला जाणार असून, त्यासाठी आता चार टप्प्यांत पाणीपुरवठा करावा लागणार आहे. याबाबत वेळापत्रक लवकरच महापालिकेकडून तयार केले जाणार आहे. 

वर्षभरातील मागणी अशी 
शहराला पाणीपुरवठा केला जाणाऱ्या वाघूर धरणात पाण्याचा जिवंत साठा 32 टक्के आहे. शहराच्या पाणीपुरवठ्याला वर्षासाठी 40 दशलक्ष घनमीटर इतकी मागणी असते. वाघूर धरणाची उच्चतम जलपातळी 233.10 मीटर आहे. तर महापालिका 220 ते 200 मीटर जलपातळीवरुन पाणी उचलते. तर डाऊनस्कीम 215 मीटरवर आहे. 

धरणातील उपलब्ध पाणीसाठा व टंचाईची स्थिती पाहता पाणीकपात करावी लागणार 
आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पत्र आले असून, महापालिकेकडून लवकरच अंमलबजावणी होईल. तीन दिवसांआड पाणीपुरवठा केल्यास दहा एमलएडी पाण्याची उचल कमी होईल. 
- डी. एस. खडके, पाणीपुरवठा अभियंता, महापालिका. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com