दहशतवादी हल्ल्याविरोधात "अब की बार आरपार' मोर्चा 

morcha
morcha

जळगाव : जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात पाकिस्तानी दहशवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्याचा निषेध आणि भारतीय जवान व सरकारच्या पाठबळासाठी स्वामी विवेकानंद बहुद्देशीय मंडळ व राष्ट्रीय सुरक्षा मंचतर्फे आज (ता.22) "अब कि बार आरपार' मोर्चा काढण्यात आला. 

पुलवामा जिल्ह्यातील हल्ल्यात 44 जवान शहीद झाले असून, या प्रकाराबाबत पाकिस्तानविरोधात भावना तीव्र आहेत. यामुळे भारताने पाकिस्तानविरोधात ठोस निर्णय घेऊन पाऊल उचलण्याची आवश्‍यक आहे. या प्रमुख मागणीसह भारतीय जवान व सरकारच्या पाठबळासाठी शहरातून मोर्चा काढण्यात आला. चौबे शाळेपासून पाकिस्तानच्या ध्वजावरून चालून मोर्चाला सुरवात करण्यात आली. यानंतर सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला.

शेकडोंचा सहभाग
अब की बार आरपार' या मोर्च्यात शहरातील शेकडो नागरिक रस्त्यावर उतरून मोर्चात सहभागी झाले होते. मुस्लिम बांधव यांच्यासह तृतीय पंथी देखील देखील सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com