वीज पुरवठा खंडित केल्याने मध्यरात्री मनमाडमध्ये रास्ता रोको

manmad
manmad

मनमाड : सलग दोन दिवस झालेल्या वादळी वाऱ्यामुळे वीज वितरण कंपनीतर्फे वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. वीज कंपनीच्या गलथान कारभारामुळे दोन दिवसांपासून मनमाड शहरातील अनेक भागात वीज खंडीत करण्यात आल्याने  नागरिक अंधारात आहेत. त्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे फोन नॉटरीचेबल असल्याने संतापात भर पडली. वीज पुरवठा सुरळीत केला जात नसल्याने संतप्त झालेल्या शिवसेना - भाजप कार्यकर्त्यांनी मध्यरात्री दोन वाजता इंदूर-पुणे महामार्ग रोखून धरत रास्ता रोको आंदोलन केले कंपनीच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

मनमाड शहर परिसरात सलग दोन दिवस झालेल्या वादळी वारा पावसामुळे चांगलेच नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली वाऱ्याचा वेग आणि पडलेल्या झाडांमुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकले गेले. त्यामुळे वीज तारा तुटल्या गेल्या त्यामुळे शहरातील अनेक भागात वीज वितरण कंपनीतर्फे वीज पुरवठा खंडित करण्यात आला. ज्या भागात नुकसान नाही तारा तुटलेल्या नाही अशाही भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर काम करण्यात आले नाही तर, वीज पुरवठा कधीपर्यंत पूर्ववत होईल याची माहिती वीज कंपनीकडून अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळे सलग दोन दिवसांपासून शहरातील अनेक भाग अंधारात आहे. पाऊस पडल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे तर वीज नसल्याने अनेक कामे खोळंबली आहे. वीज पुरवठा कधी पूर्वरत होईल यासाठी नागरिक, नेते, पदाधिकारी अनेकांनी कंपनीचा तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला मात्र, फोन नॉटरीचेबल असल्याने अनेकांच्या संतापात भर पडली. सलग दोन दिवस नागरिकांना अंधारात राहावे लागल्याने संतप्त झालेल्या महिलांनी मोर्चा काढला होता तर शिवसेना - भाजप कार्यकर्त्यांनी वीज कंपनीच्या विरोधात घोषणाबाजी देत चक्क रात्री २ च्या सुमारास इंदूर-पुणे महामार्ग रोखून धरत रास्ता रोको आंदोलन केले. मध्यरात्री अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलिस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती. सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या रास्ता रोकोमुळे दुतर्फा वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांची मोठी रांग लागली होती.अखेर आज (ता ९) दुपारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन वीज कंपनीने दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

मनमाड शहरातील सर्वच भागातील वीज वाहक तारा पूर्णतः जुनाट झाल्या आहेत. अनेकदा निवेदने देऊनही कंपनीतर्फे वीज तारा बदलण्यात येत नाही. अनेक ठिकाणी तारांचे घोसच्या घोस लटकलेले असतात मात्र वीज कंपनीकडून पावसाळ्यापूर्वी कुठलीही कामे केली जात नाहीत. त्यामुळे थोडा पाऊस जरी झाला तर, वीज पुरवठा खंडित करण्यात येतो. वीज कंपनीच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप आंदोलक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com