रावणदहन म्हणजेच देशविघातक अपप्रवृत्तींचे दहन : डॉ. सुभाष भामरे 

rawan-dahan
rawan-dahan

सटाणा - सत्प्रवृत्तीने असत्यावर, दुष्ट प्रवृत्तीवर व सद्गुणांनी दुर्गुणांवर मिळविलेला विजय म्हणजेच विजयादशमी आहे. या दिवशी होणारे रावणाचे दहन प्रतीकात्मक असले तरी समाजातील अनिष्ठ रूढी, परंपरांबरोबरच सामाजिक अशांतता पसरविणाऱ्या देशविघातक कृत्य करणाऱ्या अपप्रवृत्तींचे दहन करून सर्वधर्मीयांमध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे, हाच या दहनामागील खरा उद्देश आहे, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी काल गुरुवार (ता.१९) रोजी येथे केले.

येथील नगराध्यक्ष सुनील मोरे मित्र मंडळातर्फे सालाबादाप्रमाणे शहरातील पाठक मैदानावर सायंकाळी आठ वाजता ३१ फुटी रावणाचे दहन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी प्रवीण महाजन, नगराध्यक्ष सुनील मोरे, तहसीलदार प्रमोद हिले, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, विश्वास चंद्रात्रे, डॉ. शेषराव पाटील, उपनगराध्यक्षा संगीता देवरे, पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे, पाणीपुरवठा सभापती राहुल पाटील, गटनेते काकाजी सोनवणे, दिनकर सोनवणे, महेश देवरे, जिल्हा परिषद सदस्या मीना मोरे आदी उपस्थित होते. 

विजयादशमीनिमित्त नगराध्यक्ष सुनील मोरे मित्र मंडळातर्फे रावणदहन कार्यक्रमाचे यंदाचे सलग १५ वे वर्ष आहे. रावणदहनाचा उत्सव शहरासाठी एक प्रमुख आकर्षण असते. हा उत्सव बघण्यासाठी आज सायंकाळी सहापासून पाठक मैदानावर शहर व परिसरातील अबालवृद्धांनी गर्दी केली होती. रावणदहनानिमित्त पाठक मैदानावर तब्बल तीन तास अश्विन पाटील व महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वरांजली संगीत ग्रुपतर्फे संगीतमैफिल कार्यक्रम झाला. गायिका स्वरांजली पाटील, गायक शंकर दाभाडे व राहुल शिंदे यांनी सादर केलेल्या विविध भावगीतांमुळे उपस्थित मंत्रमुग्ध झाले होते. दरम्यान, बसस्थानकातील दत्तमंदिरापासून सजविलेल्या जीपवर श्री राम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांच्या जिवंत देखाव्याची काढण्यात आलेली मिरवणूक पाठक मैदानावर येताच उपस्थितांनी प्रभू रामचंद्रांचा जयघोष केला. या जयघोषामुळे परिसर दणाणून गेला होता.

सायंकाळी आठ वाजता केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांच्या हस्ते रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला अग्निडाग देण्यात आला. मंडळातर्फे करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने शहरवासियांचे लक्ष वेधले होते. कार्यक्रमास पंधरा हजारांहून अधिक नागरिकांच्या उपस्थितीमुळे पाठक मैदान खच्चून भरले होते. तर काही नागरिकांनी परिसरातील घरांच्या छतावर उभे राहून रावणदहनाचा आनंद लुटला. कार्यक्रमास पालिकेचे नगरसेवक राकेश खैरनार, दीपक पाकळे, बाळू बागुल, मनोहर देवरे, नगरसेविका सोनाली बैताडे, निर्मला भदाणे, पुष्पा सूर्यवंशी, सुनिता मोरकर, भारती सूर्यवंशी, सुरेखा बच्छाव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, दत्तू बैताडे, वैभव गांगुर्डे, दिलीप खैरनार, नाना मोरकर, दीपक सोनवणे, सुनील पंडित, शाम बगडाणे, परेश पाठक, अमोल खैरनार, अतुल कोठावदे, पवन सांगळे, एड. सोमदत्त मुंजवाडकर, सोपान खैरनार, एस. बी. कोठावदे, सुरेश मोरे, निलेश पाकळे, दिलीप निकम, खलील पटेल, धीरज मांडवडे, चेतन वनीस, प्रवीण सावकार, संदीप पाटील, दत्तू पवार, मिथुन सूर्यवंशी, गौरव शिंदे, शशिकांत सोनवणे, अनिल जाधव, यशवंत कात्रे, नरेंद्र महाजन, महेश कळमकर आदींसह नागरिक व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. महेंद्र शर्मा यांनी सूत्रसंचालन केले तर वैभव गांगुर्डे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com