सुळे डावा कालवा 35 किलोमीटरच्या पुढे बारमाही करणेबाबत, खामखेडाच्या शेतकऱ्यांचे जलसंपदा मंत्र्यांना निवेदन

khamkheda
khamkheda

खामखेडा (नाशिक) - कडवा धरण उपविभागांतर्गत पुनद प्रकल्पतुंन सुळे डावा कालवा किलोमीटर सदतीस ते बेचाळीस टप्प्यातील कलवा बारमाही करण्यात यावा या संदर्भात आज खामखेडा येथील शेतकऱ्यांनी मुंबई येथे विधानभवनात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत निवेदन दिले. शेतकऱ्यांच्या रास्त मागणीचा लवकरच विचार करण्यात येऊन पुढील काळात शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार केला जाईल असे आश्वासन शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळास यावेळी दिला.

पुनद प्रकल्पाअंतर्गत पूनंद धरणातून सुळे डाव्या कालव्यातून पिळकोस ता कळवण गावाच्या ३७ किमी हद्दीपर्यंत कालव्याला बारमाही पाणी मिळते.

पिळकोस गावापासून ३७ किमीच्या पुढील ४२ किमीच्या टप्प्यात खामखेडा व सावकी गावातील कालव्याला फक्त पावसाळ्यातच पूरपाणी दिले जाते. खामखेडा व सावकी गावातून जवळजवळ पाच किमीहून अधिक सुळे डावा कालवा वाहतो. मात्र फक्त पावसाळ्यातील पूरपाणी या कालव्यातून शेतकऱ्यांना मिळते. त्यामुळे जमिनी देऊनही कालव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा फायदा होत नाही. ३७ किमी च्या पुढील टप्प्यातील कालवा हा खामखेडा व सावकी गावाच्या पूर्णता डोंगराळ भागातून गेलेला आहे. कालव्यातून पाणी मिळत नसल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पिकांना तसेच जनावरांना पिण्यासाठी देखील पाणी प्रश्न नेहमीच उद्भवत असतो. तरी संबंधित विभागास सुचना देत खामखेडा व सावकी गावातील सुळे डावा कालवा ३७ ते ४२ किमी बारमाही करावा व खामखेडा तसेच सावकी शिवारातील पाझर तलावात पावसाळ्यातील पूरपाणी या तलावात साठवण्यासाठी याठिकाणी कालव्यांना गेट बसवण्यात यावे तसेच या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने ३७ किमीच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणावर कालव्याची गळती होते. व या भागातील शेतकरी संबंधित विभागास निवेदन देत पावसाळ्यातील हक्काचे पाणी देखील बंद करतात.परिणामी पूरपाणी पस्तीस किलोमीटरच्या पुढे येण्यास देखील अडचणी उद्भवतात व या भागातील शेतकऱ्यांना जमिनी देऊन देखील पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.तरी सुळे डावा कालवा ३७ किमी पर्यंत दुरुस्ती करत व ३७ किमी च्या पुढील टप्प्याचे बारमाही करण्यात यावा यासाठी आमदार राहुल आहेर यांच्या अध्यक्षतेखाली खामखेडा व सावकी येथील सरपंच सदस्य नागरिकांनी आज जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची विधानभवनात भेट घेत निवेदन दिले.

पुढील काळात जिल्हा स्तरावर बैठक घेत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिले यावेळी खामखेडाचे माजी सरपंच संतोष मोरे, अण्णा पाटील, रमेश शेवाळे, संजय मोरे, समाधान आहेर, बाळू बोरसे, बाळू मोरे, नामदेव बच्छाव, नानाजी शेवाळे, संजय बच्छाव, मुकुंद बोरसे, दीपक मोरे, साहेबराव शेवाळे, भाऊसाहेब सूर्यवंशी, गुलाब शेवाळे, साहेबराव शेवाळे, गोकुळ शेवाळे, दत्तू बोरसे, गोकुळ सूर्यवंशी, सुनील बोरसे, रामभाऊ मोरे, दादाजी शेवाळे, भाऊसाहेब शेवाळे, बाळू शेवाळे, यशवंत बच्चाव सावकीचे सरपंच निलेश पाटील, कारभारी पवार, गणेश तिवारी, दशरथ आहिरे, भाऊ पवार आदी शेतकरी यावेळेस उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com