असहकार आंदोलनामुळे बारावीच्या निकालाला बसणार खो 

yeola
yeola

येवला - विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांच्या याद्या जाहीर करून अनुदान देण्याचा शासन निर्णय काढण्यासह प्रलंबित मागण्या मान्य करण्याचे आश्वातसन शिक्षण विभागाने पूर्ण न केल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने कालपासून असहकार आंदोलन सुरु केले असून याकाळात नियामकांच्या सभा होऊ न देण्यासह उत्तरपत्रिका तपासल्या जाणार नाही.यामुळे बारावी परीक्षा सुरळीत होतील पण निकाल मात्र लांबण्याची भीती आहे.

तब्बल एक तपापासून विनावेतन काम करणार्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना अनुदान द्यावे यासह शिक्षकांच्या प्रलंबित असलेल्या विविध ३२ मागण्यांची शासनाने सोडवणूक करावी यासाठी राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे.यासाठी अनेकदा शिक्षणमंत्री विनोद तावडे व अधिकाऱ्याशी चर्चा झाल्या पण दरवेळी केवळ आश्वासने देण्यात आली आहेत.

प्राध्यापक आंदोलन करतात,शासन आश्वासन देते मात्र कृती काहीच होत नाही असे चित्र अनेक वर्षापासून सुरु आहे.याचमुळे या वर्षी प्राध्यापक आक्रमक झाले आहेत.शासनाने महासंघाला दिलेली आश्वासनांची अंमलबजावणी करावी यासाठी हे आंदोलन हाती घेण्यात आले आहे.

महासंघाच्या आदेशानुसार असहकार आंदोलन सुरू झाले असून पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या मुख्य नियामकांची बैठक पुणे व नाशिक येथे झाली नाही.तसेच यापुढे कोणत्याही विषयाच्या मुख्य नियामक व नियामकांनी मिटिंगसाठी पुणे व नाशिक बोर्डात जावू नये.याठिकाणी संघटनेचे पदाधिकारी दिवसभर हजर राहणार आहेत.आश्वासन नाही तर थेट कृती होईपर्यत असहकार आंदोलन सुरु राहील असे महासंघाचे सचिव व जिल्हाध्यक्ष प्रा.संजय शिंदे,जिल्हा सचिव प्रा.अनिल महाजन,जिल्हा पदाधिकारी अंबादास ठोले,येवला तालुकाध्यक्ष प्रा. एम.पी.गायकवाड यांनी सांगितले. 

वेतनासाठी शिक्षकांचा टाहो 
विनावेतन काम करणाऱ्या प्राध्यापकांना असलेल्या अपेक्षा या सरकारचे अद्याप पूर्ण केलेल्या नाहीत.अनुदानास पात्र कनिष्ठ महाविद्यालयांची यादी जाहीर करून अनुदान द्यावे हि मागणी देखील अद्याप पूर्ण नाही.त्यामुळे विनावेतन काम करणाऱ्या तरुण शिक्षकांच्या प्रतीक्षेचा कडेलोट झाला आहे.याचा विचार करून तत्काळ यादीचा शासन निर्णय काढावा व अनुदान जाहीर करावे यासाठी हजारो शिक्षक टाहो करत रात्र-दिवस शासनाच्या घोषणेकडे नजर लावून बसली आहेत.

“त्याच त्या मागण्या पुनःपुन्हा घेऊन आम्ही आंदोलन करत आहोत.शिक्षण विभागाने दिलेला शब्द न पाळल्याने हि वेळ येत आहे.विध्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही पण उत्तरपत्रिका तपासणीवर व इतर कामावर असहकार करणार आहोत.शेतकऱ्यांना वेळोवेळी फसवणाऱ्या या सरकारने शिक्षकांना मात्र फसवू नये.”
-प्रा.एम.पी.गायकवाड,तालुकाध्यक्ष,येवला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com