कर्जाची रक्कम न देणाऱ्या कुटूंबियांचे अपहरण; चौघांविरोधात खंडणीचा गुन्हा

Residential photo
Residential photo

नाशिक, ता. 13 : कर्ज फेडण्यासाठी व्याजाने घेतलेली रक्कम परत करण्यास विलंब होत असल्याने चौघा संशयितांनी कुटूंबियांचे अपहरण करीत त्यांच्याकडून हमीपत्र लिहून गेले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात चौघांविरोधात खंडणी, अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेमंत जाधव (रा. मखमलाबाद), दत्ता काळे (दिंडोरीरोड, पंचवटी), अमित इर्शिद उर्फ टोनी (रा. कॅनडा कॉर्नर), रिकी सुधीर धोंड (रा. मल्हारखान झोपडपट्टी) असे संशयितांची नावे आहेत. स्वप्निल दत्तात्रय माळवे (रा. जयश्री प्लाझा, कलानगर, इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्यावर असलेले कर्ज फेडण्यासाठी त्यांनी 2016 मध्ये संशयितांकडून व्याजाने पैसे घेतले होते. परंतु दरम्यानच्या काळात श्री. माळवे यांची आर्थिक परिस्थिती खालावल्याने ते व्याजाने घेतलेले पैसे देऊ शकले नाहीत. त्यामुळे संशयित हेमंत जाधव याने वारंवार फोन करून शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली. संशयित दत्ता काळे, संशयित टोनी यांनी श्री. माळवे यांना शिवीगाळ केली. तर, संशयित धोंड याने माळवे व त्यांच्या कुटूंबियांना कारमध्ये बळजबरीने बसवून कॉलेजरोड येथे आणले आणि त्यांच्याकडून बळजबरीने हमीपत्र तयार करून घेतले. संशयितांकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून पोलिसात धाव घेतली. त्यानुसार, याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात खंडणी, अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक जगदाळे हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com