शासन 2022 नंतर माणसांना श्रीमंत करणार 

शासन 2022 नंतर माणसांना श्रीमंत करणार 

शासन 2022 नंतर माणसांना श्रीमंत करणार 


जळगावः शासन सध्या अनेक लोकोपयोगी योजनांवर पैसा करीत आहे. त्याबरोबर उत्पन्नाचे स्रोतही बळकट करत आहे. जीएसटी, इन्कम टॅक्‍स यातून उत्पन्न येते. 2022 पर्यंत राज्यातील पायाभूत सुविधा देण्याचे काम पूर्ण झालेले असेल. यामुळे आलेल्या उत्पन्नातून माणसांना श्रीमंत करण्यासाठी शासन पैसा खर्च असेल अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. 
सकाळी साडेसातला अजिंठा रेस्ट हाऊसवर त्यांनी जिल्ह्यातील दुष्काळ, पाणी टंचाईबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

राज्यात शासनातर्फे मागेल त्याला शौचालये, मागेल त्याला घरे, मागेल त्याला रोजगार देण्याचा कार्यक्रम सुरू आहे. पायाभूत सुविधांमध्ये मोठया शहरामध्ये मेट्रो रेल्वे, इतर ठिकाणी रस्त्याची कामे, धरणांची कामे, रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहे. मागेल त्याला शौचालये देण्यात येत आहे. यामुळे आता शौचालयांचे कामे पूर्ण होत आहे. रस्त्यांसाठीही निधीची तरतूद आहे ती कामेही पूर्ण होतील. रोजगार हमी योजनेत पूर्वी शंभर दिवसच कामे दिली जात होती. आता 365 दिवस कामे देण्याचे नियोजन सुरू आहे. या योजनेत नियोजित केलेल्या कामाव्यतिरिक्त आणखी28 कामे अधिक वाढविण्यात आली आहे. यात शाळांना कुंपण बांधण्यासारखी कामे आहे. 
2022 पर्यंत पायाभूत सुविधा पूर्ण झालेल्या असतील. त्यामुळे जीएसटी, इंकम टॅक्‍सच्या कररूपाने येणारा निधी माणसांना श्रीमंत करण्यासाठी शासन खर्च करेल. 

जळगाव जिल्ह्यात दुष्काळासाठी 404 कोटी मंजूर होते. त्यापैकी 246 कोटींचे वाटप झाले आहे. 3 लाख 52 हजार शेतकऱ्यांना ही मदत देण्यात आली आहे. उर्वरित मदतही लवकरच दिली जाईल. 
जिल्ह्यात जुलै अखेर पुरेल एवढा चारा आहे. यामुळे जिल्ह्यात जनावरांना चारा टंचाई भासणार नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com