‘शेतकरी सन्मान’चे पैसे गेले परत

Farmer
Farmer

येवला - शासनाने शेतकरी सन्मान योजनेत आपला समावेश करून बॅंकेच्या खात्यात दोन हजार रुपये जमा केले हा आनंद नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांसाठी क्षणभंगूर ठरला आहे. कारण योजनेचे सन्मानाने खात्यावर जमा झालेले पैसे काही वेळातच पुन्हा माघारी घेतले गेले असून, शेतकऱ्यांना ‘रिव्हर्सल’ असे कारण यामागे मिळत आहे. हे पैसे का माघारी गेले याचे उत्तर कुणाकडेच नसले तरी शेतकरी मात्र हा सन्मान नव्हे, तर अपमान असल्याची संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. अशाच प्रकारच्या घटना परभणी आणि नांदेड जिल्ह्यातही घडल्याचे समजते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल (ता. २५) या योजनेचा प्रारंभ करण्यात आला असून देशातील शेतकऱ्यांना या दोन हजार रूपयांच्या सन्मान योजनेचा पहिला हप्ता वर्ग करण्यात आला. मोठा गाजावाजा करून ही योजना अंमलात आणल्याने काल बॅंकेच्या खात्यात पैसे जमा होताच शेतकऱ्यांना आवर्जून पैसे जमा झाल्याचे संदेश बॅंकेच्या सर्व्हर मार्फत मिळाले. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही शेतकऱ्यांचे सन्मानासह शेतीच्या गरजांसाठी पैशांचा वापर करण्याचा आवाहन करणारे संदेशही आले. मात्र काही वेळातच पुन्हा ही रक्कम ‘रिव्हर्सल’, या कारणाने ज्या सर्व्हरवरून आली होती त्याच 

बॅंकेने या सन्मान योजनेच्या निधीमध्ये कुठलाही हस्तक्षेप केलेला नाही. ज्या सर्व्हरवरून हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले, त्याच सर्व्हरवर हे पैसे परत गेलेले आहेत. शेतकऱ्यांच्या या मदत निधीतून बॅंका कुठलेही कर्ज वजावट करणार नसून, हा निधी कुठेही ट्रान्सफर केला जाणार नाही.
- एक बॅंक अधिकारी, राष्ट्रीयीकृत बॅंक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com