नाशिक शहरात आज पाणीबंद अंमलबजावणीला सुरवात

Water
Water

नाशिक - गंगापूर धरणातील अत्यल्प साठा व पावसाने अद्याप धरण परिसरात दमदार हजेरी न लावल्याने रविवार(ता. ३०)पासून सुरू झालेल्या पाणीकपातीच्या दुसऱ्या टप्प्यात दर गुरुवारी शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. त्याची अंमलजावणी ४ जुलैपासून होणार आहे. त्यामुळे पावसाचे वातावरण असले तरी शहरवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. महापालिकेने भविष्याच्या दृष्टीने पाणीकपात केली आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अत्यल्प साठा आहे. सध्या इन्टेक वेलच्या न्यूनतम पातळीपर्यंत पाणीसाठा आला आहे. त्यामुळे चर खोदण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे. शनिवारपासून शहरात पावसाला सुरवात झाली असली तरी धरण परिसरात अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. पावसाने ओढ दिल्यास गंभीर टंचाई निर्माण होणार असल्याने सद्यःस्थितीतील पाणी जपून वापरण्यासाठी प्रशासनाने जेथे दोनदा पाणी पुरवठा होतो तेथे एकवेळ पुरवठा करण्याचा निर्णय रविवारपासून अमलात आणला. पुढील दोन दिवस पाऊस कायम राहिल्यास गुरुवारची संपूर्ण दिवसाची पाणीकपात होणार नव्हती; परंतु पाऊस पुन्हा थांबल्याने बुधवारी (ता. ३) पाणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com