गिरणातून सुटणार उद्या पिण्यासाठी आवर्तन

Girna Dam
Girna Dam

पिलखोड(ता. चाळीसगाव) : गिरणा काठावरील शहरे व गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या तीव्र होत चालली आहे. टंचाई निवारणार्थ गिरणातून आवर्तन सोडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतेच गिरणा पाटबंधारे विभागाला दिले आहेत, अशी माहिती शाखा अभियंता एस. आर. पाटील यांनी 'सकाळ'ला दिली. त्यानुसार उद्या (ता. 3, मंगळवार) धरणातून पिण्यासाठी आवर्तन सुटणार आहे.

जिल्हयातील पाचोरा शहरासह अनेक गावांमध्ये सध्या पाणी टंचाईची समस्या जोर धरू लागली आहे. नागरीकांची पाण्यासाठी भटकंती सुरु झाली आहे.टंचाई निवारणार्थ गिरणा धरणातून आवर्तन सोडण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. सद्य:स्थिती बघता पाणी टंचाई दूर व्हावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी धरणातून आवर्तन सोडण्याचे आदेश गिरणा पाटबंधारे विभागाला नुकतेच दिले आहेत. त्यानुसार उद्या (ता. 3, मंगळवार) 2 हजार क्यूसेक एवढे आवर्तन धरणातून सोडण्यात येणार आहे, अशी माहिती गिरणाचे शाखा अभियंता एस. आर. पाटील यांनी 'सकाळ' शी बोलताना दिली. 

धरणातून आवर्तन सुटणार असल्याने नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन देखील पाटबंधारे विभागाने केले आहे. तसेच हे आवर्तन पिण्यासाठीच असल्याने त्याचा उपयोग इतर कुठल्याच कामांसाठी करू नये, तसे आढळल्यास संबधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com