शहरातील पाणीपुरवठा तीन दिवसांआडच राहणार

Water-Supply
Water-Supply

जळगाव - स्थायी समितीच्या सभेत काही सदस्यांनी शहरातील पाणीपुरवठा तीनऐवजी दोन दिवसांआड करण्याची मागणी केली होती. याबाबत सभापतींच्या दालनात मंगळवारी (ता. ३०) झालेल्या बैठकीत वाघूर धरणात पाणीसाठा २२ टक्केच असल्याने अजून पाणीपुरवठा दोन दिवसांआड करणे योग्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार पाणीपुरवठा सध्यातरी तीन दिवसांआड राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पाणीपुरवठा दोन दिवसांआड करण्याच्या मागणीवरून सभापती जितेंद्र मराठे यांनी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता डी. एस. खडके यांच्यासोबत मंगळवारी बैठक घेतली. त्यानुसार बैठकीत झालेल्या चर्चेनुसार शहरासाठी पाण्याचे वाघूर धरणाचे वर्षाचे ६०.८२५ दशलक्ष घनमीटरचे आरक्षण आहे. सध्या ५६.०० दलघमी पाणीसाठा आहे. मागील वर्षी ३४ टक्के पाणीसाठा होता आता २२ टक्के असून, धरणाच्या पाणीसाठ्यात अजून वाढ होणे आवश्‍यक आहे. १ जून २०१८ ला धरणाची पाणीपातळी २२९.०० मीटर इतकी होती तर १ जून २०१९ ला २२५.९० मीटर इतकी असल्याने ३ मीटर इतकी अजूनही पाणीपातळी कमी आहे.

त्यामुळे उन्हाळ्यात ज्या प्रमाणे पाणीटंचाईला सामोरे जावे लागले तसे होऊ नये, धरणातील पाणीपातळी वाढणे आवश्‍यक आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यानुसार झालेल्या चर्चेनुसार पाणीपुरवठा वेळापत्रकात बदल होणार नसल्याचे निर्णय घेण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com