सापूतारा-पिंपळगांव बसवंत राष्ट्रीय महामार्गाचे काम स्वाभीमानी शेतकरी संघटनेने केले बंद

सापूतारा-पिंपळगांव बसवंत राष्ट्रीय महामार्गाचे काम स्वाभीमानी शेतकरी संघटनेने केले बंद

वणी(नाशिक) : सराड ते वणी या दरम्यान सुरु झालेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 953 चे रस्त्यासाठी शेतकरी बांधवाना कुठलीही पूर्व लेखी सूचना न देता शेतकऱ्यांवर दडपशाही करुन उभ्या असलेल्या पीकाची नासाडी करीत रस्त्याचे सुरु करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम संतप्त शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा बंद पाडले आहे. 

दरम्यान रस्त्यामुळे बाधीत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनाही आज ता.१ मैदानात उतरली असून जो पर्यंत बाधीत शेतकऱ्यांचे अधिगृहीत करीत असलेल्या जमिनीचे मोजमाप करुन खुणा करुन देत नाही व अधिगृहीत केलेल्या जमिनीचा तसेच उभ्या असलेल्या पिकांच्या नुकसानीचा जोपर्यंत मोबदला मिळत नाही तो पर्यंत रस्त्याचे काम सुरु करु देणार नसल्याचे सांगत केंद्रीय रस्ते वाहतुक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते संदीप जगताप यांनी दिला आहे.

करंजखेड फाटा, ता. दिंडोरी  येथे आज राष्ट्रीय महामार्ग मुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचे बैठक संपन्न झाली. बैठकीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते संदीप जगताप यांच्यासह विलास कड, संजय वाघ, संजय कड, नामदेव तडाखे, सचिन कड, वामन राऊत, संतोष रेहरे, सम्राट राऊत, भोजराज चौधरी, पंडित भरसट, नारायण तुंगार, दिनकर जोपळे, निवृत्ती काकड, गंगाराम चौधरी, तुकाराम गांगोडे, पुंडलिक चौधरी, विलास चौरे, काशिनाथ जोपळे, आप्पा गावित, उत्तम महाले, गुलाब चौरे, छबु गांगुर्डे, नामदेव चौधरी, हिरामण चौधरी, निवृत्ती पवार, हिरामण गायकवाड, माणिक जोपळे अमोल चौरे आदींसह करंजखेड, चौसाळे, खोरीपाडा,  माळेदुमाला, पिंपरी अंचला, पिंगळवाडी, अंबानेर, वणी आदी ठिकाणचे बाधित शेतकरी सहभागी झाले होते. आठ दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार नरहरी झिरवाळ, जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. यांनी बाधित शेतकरी भूसंपादन विभागाचे अधिकारी राष्ट्रीय महा मार्गाचे संबंधित अधिकारी यांची बैठक घेतली होती. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी आठ दिवसात संबंधित बाधीत शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन अधिग्रहित केली जाणारी जमीन मोजून देण्याचे व शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरसन करण्याचे सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केले होते.

मात्र आठ दिवस उलटूनही कुठलेही अधिकार शेतकऱ्यांकडे फिरकले नसल्याने व रस्त्याचे काम दडपशाहीच्या मार्गाने सुरू केल्याने सोमवारी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा करंजखेड येथे फाटा बैठक बोलावली होती. या बाधीत शेतकऱ्यांच्या पाठीशी स्वाभिमानी शेतकरी संघटनाही उभी राहिली असून जोपर्यंत बाधीत शेतकऱ्यांकडून अधिगृहीत केलेल्या जमिनीचा मोबदला व पिकांची नुकसान भरपाई मिळत नाही, तोपर्यंत रस्त्याचे महामार्गाचे काम होऊ देणार नसल्याचा इशारा बाधित शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. यासाठी दिल्ली दरबारी आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी संघटनेचे प्रवक्ते संदीप जगताप यांनी दिला आहे. यावेळी श्री जगताप यांनी स्वाभिमानी  शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनाही शेतकऱ्यांच्या प्रश्न ची माहिती दिली असता, खासदार शेट्टी यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करीत सुरू असलेल्या चुकीचे काम त्वरित बंद करण्याचा सूचना केली असल्याचे सांगितले. यावेळी काम करणाऱ्या ठेकेदाराने अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार रस्त्याचे सुरू असलेले काम पुन्हा एकदा बंद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com