येवल्यात तेरा महिन्यांपासून होतोय टँकरने पाणीपुरवठा!

येवल्यात तेरा महिन्यांपासून होतोय टँकरने पाणीपुरवठा!

येवला : गावांना पाणीटंचाई निर्माण होऊन टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ मार्च, एप्रिल, मे या महिन्यात येते. खूपच भयानक टंचाई असेल तर जानेवारीपासून टँकर सुरू करण्याची वेळ आल्याचा अनुभव तालुक्याने घेतला आहे. मात्र, तालुक्यात वर्ष उलटला तरीही टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 12 मार्च २०१८ टँकर सुरु झाले. ते आज तेरावा महिना टँकरच्या पाणीपुरवठ्याचा सुरू झाला असून, यासाठी दोन कोटींपर्यंतचा खर्च पाण्यात गेला आहे.

राज्यातील ज्या ९४ तालुक्यांची दुष्काळी अशी नोंद आहे, त्यात येवल्याचे नाव अग्रस्थानी असून, प्रत्येक उन्हाळा येथील जनतेला असह्य करणारा ठरत आहे. उन्हाळ्यातील तीन ते चार महिने येथील ५० वर गावे व वस्त्यांना टँकर सुरु केल्याशिवाय पर्यायच नसतो. समाधानाची बाब म्हणजे ३८ गाव नळ पाणीपुरवठा योजेना पूर्णत्वास जाऊन आजमितीस ५५ गावे टँकरमुक्त झाली आहेत. अशीच अजून एक मोठया योजनेची तालुक्याला गरज आहे. तरच येथील टँकरग्रस्त हा शाप पुसला जाणार आहे. नाहीतर ब्रिटिशकालीन टँकरग्रस्त तालुका अजून किती वर्ष हा शाप घेऊन जगेल याचे उत्तर भविष्यकाळाच देईल.

गेल्यावर्षी म्हणजे २०१७-१८ मध्ये अल्प पाऊस पडला. पाटपाण्याचा कायमस्वरूपी असा कुठलाच स्रोत नसलेल्या तालुक्यातील उत्तरपूर्व भागाला या तीव्र पाणीटंचाईची अधिक झळा सहन करावी लागली. जानेवारी महिन्यापासून पाणी टँकर मागणीचे प्रस्ताव पंचायत समिती व प्रशासनाकडे आले होते. मात्र,जलयुक्तचे अपयश झाकण्यासाठी प्रशासनाने जाणीवपूर्वक उशिराने मंजुरी दिल्याने टँकरचा ’श्रीगणेशा’ १२ मार्चपासून झाला. त्यानंतर पुढे दिवसागणिक तहानलेल्या गावांची संख्या वाढतच गेली.

१२ मार्च २०१८ ते आजतागायत...

खैरगव्हाण व कुसमाडी येथे टँकर ३ ला मंजुरी देत १२ मार्चला टँकरने पाणीपुरवठा सुरु झाला. गेल्या वर्षी मार्चमध्ये ४,एप्रिलमध्ये १३ तर मे मध्ये २४ गावांना मागील उन्हाळ्यात टँकर सुरु करण्यात आले. ते आजही सरूच असून या गावात पावसाळयाचे फक्त महिने संपले. पण पाऊस मात्र रिमझिमच पडल्याने जलस्रोत कोरडेच राहिले. अन् तहान भागवण्यासाठी टँकर सुरुच ठेवावे लागले. चार-दोन दिवसांचे तांत्रिक अपवाद वगळता अजूनही सुरूच आहे.  

तालुक्यातील आहेरवाडी, कुसमाडी, खैरगव्हाण, चांदगाव, कासारखेडे, बाळापूर, पिंपळखुटे तिसरे, कोळगाव, वाईबोथी, ममदापूर, खिर्डीसाठे, लहीत, गुजरखेडे व खैरगव्हाण,राजापूर अशी काही गावे यात आहेत. मे नंतर नव्याने गावांची संख्या वाढली नाही पण पावसाळा कोरडा गेला. अन् पुन्हा ऑक्टोबर पासून टँकरची मागणी सुरु झाली. ती आजतागायत वाढतच आहे. याचमुळे आजमितीस ३१ टँकरद्वारे ५० गावे व ३२ वाड्याना रोज ७९ खेपाद्वारे सुमारे दोन लाख नागरिकांसाठी रोज सुमारे बारा लाख लिटर पाणी पुरवण्याची वेळ येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com