शेतातून गेलेल्या विजेच्या तारांचे आपसात झाले घर्षण; हताश बळीराजाशी घडला असा दुर्दैवी प्रसंग

fire sugarcane in a field in Nagpur district
fire sugarcane in a field in Nagpur district

नांद (जि. नागपूर) : शेतातून गेलेल्या विजेच्या तारांचे आपसात घर्षण होऊन उडालेल्या ठिणगीमुळे आग लागून शेतकऱ्याचे उसाचे पीक जळून खाक झाले. यामुळे प्रगतिशील शेतकरी माणिक कान्हुजी दांडेकर यांचे १६ लाख रुपयांचे नुकसान झाले.

माणिक कान्हुजी दांडेकर यांचे शेत सुकळी (रिठी) येथे आहे. या शेतात आठ वर्षांपासून ते उसाचे उत्पादन घेत आहेत. उस उत्पादनाचे यंदाचे नववे वर्ष आहे. विशेष म्हणजे शेतातच उसावर प्रक्रिया करून गुळाच्या भेली बनवून मार्केटमध्ये विकतात. परंतु, विजेच्या तारांवर शार्टसर्किटमुळे जवळपास नऊ एकर जागेतील ऊस जळून राख झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले.

उसाला बोरमधील पाणीपुरवठा कमी पडत असल्याने त्यांनी ड्रिप संचाकरिता विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेच्या उमरेड शाखेतून आठ लाख ४० हजार रुपयांचे कर्ज घेऊन ड्रिप संच शेतात उभारला होता. परंतु, शेतातील विजेच्या तारांचे घर्षण झाल्याने शार्ट सर्किट होऊन आग लागून ऊस व ड्रिप संच जळून खाक झाला.

याबाबत माणिक दांडेकर यांनी फोनवरून स्थानिक लाईनमन ईश्र्वर वाकडे यांना सूचना केली असता लाईनमन वाकडे यांनी तत्काळ विद्युत पुरवठा बंद करून घेतला. तोपर्यंत ड्रिप संच व ऊस जळून खाक झाला होता. सदर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात १६ लाख रुपयांचे नुकसान झाले. विद्युत विभागाच्या हलगर्जीपणामुळे नुकसान झाले असून, भरपाई मिळावी अशी मागणी दांडेकर यांनी केली.

यंदा दुहेरी नुकसान

यंदा अतिपावसामुळे सोयाबीन, कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे खरिपाचे पीक हातचे गेले. पाण्याची उत्तम सोय असल्याने दांडेकर यांना उस आणि इतर पिकांकडून अपेक्षा होती. परंतु, हाताशी आलेला ऊस जळाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com