नागपूर : आमच्या मुलांना शाळेत बोलावून त्यांच्यावर प्रयोग का करता? उद्या आमच्या मुलांना संसर्ग झाला, तर त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का? असा संतप्त सवाल पालक वर्ग करू लागले आहेत. सोशल मीडियावरून या प्रकारच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पालकांनी असे अनेक प्रश्न सररकारला विचारून धारेवर धरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
15 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याबाबत सरकारचा विचार सुरू आहे. अनेक शाळा व्यवस्थापनानेही याबाबत चर्चा सुरू केल्या आहेत. परंतु कोरोनामुळे मुंबई, पुणे, नागपूर, अकोला आदी शहरे बेजार झाली आहेत. एवढेच नव्हे तर ग्रामीण भागातही कोरोना रुग्ण हळूहळू सापडू लागले आहे. एकूणच कोरोनाने कहर माजवला असताना, शाळा सुरू करण्याचा विचार म्हणजे महाभयंकर असून आमच्या मुलांच्या जीवनासोबत खेळण्याचाच प्रकार आहे, अशा संतप्त प्रक्रिया सोशल मीडियावरून उमटत आहे. सरकारला उद्देशून अनेक प्रश्नही विचारले जात आहेत..
विजय ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर शाळा सुरू करण्याच्या चर्चेवर "एका पालकाने विचारलेले प्रश्न' या मथळ्याखाली लांबलचक प्रश्नांची पोस्टच टाकली आहे. खालील पैकी एका जरी प्रश्नाचे उत्तर देता आले तर नक्की शाळा सुरू करा, असे आवाहनही या पत्रात केले आहे. या पत्रात उपस्थित केलेले प्रश्न वाचाच...
यापैकी कोणाचे उत्तर हो म्हणून आहे? याबाबत विचार अवश्य करा, असे आवाहनही पालकाने केले आहे. एकूणच काय तर मुलांसी शाळा सुरू होणार या चर्चेवरून पालक चिंतित आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.