नागपूर : यंदाच्या खरीप हंगामात सत्तर हजार शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात आले. मागील वर्षीच्या तुलनेत यात वाढ झाली आहे. सरकारकडून करण्यात आलेल्या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना आकडा वाढल्याचे सांगण्यात येते.
नागपूर जिल्ह्याला खरीप हंगामात पीक कर्ज वाटपासाठी १,०३५ कोटी ३० लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार ३० ऑक्टोबरपर्यंत ७० हजार ४७ शेतकऱ्यांना ७६७ कोटी तीन लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले. ७४ टक्के कर्ज वाटप करण्यात आले. सर्वाधिक १८३ कोटी रुपये बॅंक ऑफ इंडियाकडून वाटप करण्यात आले.
बॅंक ऑफ महाराष्ट्रकडून दिलेले उद्दिष्टापेक्षा म्हणजे ११४ टक्के कर्जवाटप करण्यात आले. बॅंक ऑफ महाराष्ट्राला ७७ कोटी ४३ लाखांचे उद्दिष्ट होते. त्यांनी ८८ कोटी २६ लाखांचे कर्ज वितरित केले. कोरोनामुळे यंदा कर्ज वाटपावर परिणाम होण्याची व्यक्त भीती व्यक्त करण्यात येत होती. गेल्या वर्षी कर्ज वाटपाची आकडा ५५ टक्केच्या घरात होता. त्यामुळे यंदाही ही टक्केवारी त्यापेक्षा कमी राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.
सरकारने दोन लाख रुपयापर्यंतच्या कर्जदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील ४० हजारांवर शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळण्यास मदत झाल्याचे सांगण्यात येते.
संपादन - नीलेश डाखोरे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.